शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी विनापरीक्षा पास होणार, मूल्यांकन कसे करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कोरोना-१९ आजाराचा वाढता संसर्ग लक्षात घेत पाहिली ते आठवी आणि नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : कोरोना-१९ आजाराचा वाढता संसर्ग लक्षात घेत पाहिली ते आठवी आणि नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून राज्य सरकारणे या वर्गाच्या परीक्षा रद्द केल्या असून, आरटीई कायद्यानुसार उत्तीर्ण असा शेरा देऊन गुणपत्रक तयार करण्याच्या सूचना शाळांना केल्या आहेत. ही प्रक्रिया पाहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मात्र ज्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन झालेले नाही त्यांच्यासाठी शक्य असली तरी नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन व गुणपत्रक कसे तयार करणार यासंदर्भात शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांनी परिपत्रक काढून मूल्यमापन कसे करावे? याबाबत मार्गदर्शन केलेले आहे. त्यानुसार ज्या शाळांनी आकारिक मूल्यमापन (अंतर्गत चाचणी व तोंडीपरीक्षा) करून गुणदान केलेले आहे. त्यांनी आकारिक मूल्यमापनाच्या गुणानुसार विद्यार्थ्यांचे गुणपत्रक तयार करावे? तसेच पहिली ते आठवीच्या ज्या शाळांनी आकारिक मूल्यमापनदेखील केलेले नाही अशा विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर आरटीई कलम १६ नुसार पुढील वर्गात वर्गोन्नोत असा शेरा द्यावा, असे सूचित केलेले आहे. त्याचप्रमाणे नववी अकरावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुणांच्या गुणदान कसे करावे? याचे मार्गदर्शन केलेले आहे. त्यानुसार गुणपत्रक तयार करावे? असे सूचित केलेले आहे. परंतु ज्या शाळांनी अंतर्गत मूल्यमापन केलेले नाही त्यांची गुणपत्रक तयार करण्याविषयी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. कारण आरटीई कायदा आठवीपर्यंत लागू आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही विद्यार्थ्यास नापास करू नये आणि पुनश्च नव्याने ऑनलाइन अथवा ऑफलाइन मूल्यमापन करू नये असे सूचित केलेले आहे. त्यामुळे अजूनच गोंधळ निर्माण झालेला आहे. नववी व अकरावी मूल्यामापनाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली आहे.

कोट

- ज्या शाळांनी नववी व अकरावीचेअंतर्गत मूल्यमापन केलेले नाही, त्यांना किमान २० गुणांचे व्हॉट्सॲप, ऑनलाइन मूल्यमापन करण्याची परवानगी दिल्यास त्याचे १०० गुणांमध्ये रूपांतर करता येईल किंवा सरसकट या वर्गाच्या विद्यार्थ्यांना आरटीईनुसार शेरा देऊन गुणपत्रक देण्याची परवानगी द्यावी म्हणजे मुख्याध्यापक शिक्षकांचा संभ्रम राहणार नाही.

- एस. बी. देशमुख, सचिव, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ

कोट -

नाशिक जिल्ह्यात शाळा जानेवारीत उशिरा सुरू झाल्या आणि मार्चमध्ये लगेच बंद करण्यात आल्या. या कालावधीत शिक्षकांना अध्यापनाबरोबर विद्यार्थ्यांची मानसिकता स्थिर करावी लागली. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापन करता आले नाही. त्यामुळे मूल्यामापनाबाबत शिक्षण आणि विभागाने ठोस निर्णय घ्यावा.

-पी. के. धुळे, कार्याध्यक्ष, निफाड तालुका मुख्याध्यापक संघ

इन्फो -

मूल्यमापन करण्याची संधीच शाळांना मिळाली नाही.

शासनाने शाळा सुरू करताना केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यार्थांच्या जवळ जाऊ नये. वही, पेन, पेन्सिल इतर साहित्याची देवाण-घेवाण करू नये. स्वाध्याय वह्या जमा करू नये/कोणत्याही परीक्षा घेऊ नये असे सूचित केलेले होते, परिणामी बहुतेक शाळांनी फक्त अध्यापन केले. मूल्यमापन करण्याची संधीच शाळांना मिळाली नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.