शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

भरकटलेल्या पिढीला सुसंस्कारित करण्याची ताकद

By admin | Updated: September 2, 2016 23:32 IST

स्वामींच्या विचारातमहंतांचा विश्वास : महानुभाव पंथाचे तत्त्वज्ञान समाजासाठी तारक

मुकुंद बाविस्कर  नाशिक‘कुतस्त्वा कश्मलमिंद विषमे समुपस्थितम्’ या श्रीमद्भगवद् गीतेतील वचनाचा भावार्थ असा की, कोणत्याही क्षणीक सुखाचा मोह हा मनुष्याला विनाशाकडे नेणारा मार्ग असतो. त्यासाठी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा स्वीकार करण्यासाठी जेव्हा मनुष्याला स्वत:चाच धाक नसेल तेव्हा निदान कुटुंब, समाज, धर्म-पंथाचा धाक असावा लागतो. आजच्या मोहमयी जगतात, असा धाक तथा शिस्त तरुण पिढीमध्ये निर्माण करून त्यांना व्यसने व कुमार्गापासून प्रवृत्त करीत सुसंस्काराकडे वळविण्याची ताकद महानुभाव पंथ व चक्रधर स्वामी यांच्या विचार व तत्त्वज्ञानात आहे, असा दृढविश्वास पंथातील अभ्यासकांनी आणि संत महंतांनी व्यक्त केला. दरम्यान, या पंथातील अनुयायी व साधकांनीही आपल्याला याची पदोपदी प्रचिती येत असल्याची भावना व्यक्त केली. चक्रधर जयंतीच्या पार्श्वभूमीवर आजच्या काळात महानुभाव पंथाचे आचार विचार व स्वामींची सत्वचने समाजहितासाठी अत्यंत पोषक आणि मौल्यवान असल्याचे अनेकांनी सांगितले. इतकेच नव्हे तर नैराश्यातून परावृत्त करीत सन्मानाने जीवन जगण्याचे तत्त्व पंथ सांगत असल्याने कोणीही खरा पंथीय आत्महत्त्येस प्रवृत्त होत नाही, असेही काही महंतांनी सांगितले.बाराव्या शतकात वैदीक धर्माच्या नावाखाली कर्मकांड युक्त धर्माचा पगडा निर्माण झालेला होता. एक प्रकारे चक्रधर स्वामी यांच्या रूपाने महाराष्ट्रात समाज परिवर्तनाची आणि धर्मप्रवर्तनाची लाट आली. गुजरात राज्यातून महाराष्ट्रात परिभ्रमणासाठी आलेल्या स्वामींनी मराठी मुलुख हीच आपली कर्मभूमी मानून तळमळीने व कळकळीने समाजोद्धाराचे व लोकजागरणाचे कार्य केले. ‘सर्व जिवांना धर्माचा, मोक्षाचा व भक्तीचा अधिकार आहे. स्त्री-पुरुष समान असून वर्ण व्यवस्था मानू नका, सत्य-अहिंसेचे पालन करा, मद्य-मांसादी सप्त व्यसनांपासून दूर राहा, असा साध्या सोप्या भाषेत लोकप्रबोधनाचा प्रचार व प्रसार गावागावात जाऊन स्वामी व त्यांच्या शिष्य परिवाराने केला. इतकेच नव्हे तर हिंसेकडे वळालेल्या, भटकलेल्या तरुणांना शांतीचा मार्ग सांगितला. आजच्या काळातील दहशतवादी, व्यसनाधीन व नैराश्यवादी तरुण पिढी बघता पुन्हा एकदा सुंदर व आशावादी जीवनाकडे वळविण्यासाठी चक्रधर स्वामींच्या विचारांची मोठ्या प्रमाणावर मांडणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. नेमकी हीच मांडणी पंथीय महंत करीत आहेत, असे मत अखिल भारतीय महानुभाव युवा परिषदेचे अध्यक्ष, महंत संतोषमुनी शास्त्री कपाटे यांनी व्यक्त केले.