शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

भरकटलेल्या पिढीला सुसंस्कारित करण्याची ताकद

By admin | Updated: September 2, 2016 23:32 IST

स्वामींच्या विचारातमहंतांचा विश्वास : महानुभाव पंथाचे तत्त्वज्ञान समाजासाठी तारक

मुकुंद बाविस्कर  नाशिक‘कुतस्त्वा कश्मलमिंद विषमे समुपस्थितम्’ या श्रीमद्भगवद् गीतेतील वचनाचा भावार्थ असा की, कोणत्याही क्षणीक सुखाचा मोह हा मनुष्याला विनाशाकडे नेणारा मार्ग असतो. त्यासाठी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा स्वीकार करण्यासाठी जेव्हा मनुष्याला स्वत:चाच धाक नसेल तेव्हा निदान कुटुंब, समाज, धर्म-पंथाचा धाक असावा लागतो. आजच्या मोहमयी जगतात, असा धाक तथा शिस्त तरुण पिढीमध्ये निर्माण करून त्यांना व्यसने व कुमार्गापासून प्रवृत्त करीत सुसंस्काराकडे वळविण्याची ताकद महानुभाव पंथ व चक्रधर स्वामी यांच्या विचार व तत्त्वज्ञानात आहे, असा दृढविश्वास पंथातील अभ्यासकांनी आणि संत महंतांनी व्यक्त केला. दरम्यान, या पंथातील अनुयायी व साधकांनीही आपल्याला याची पदोपदी प्रचिती येत असल्याची भावना व्यक्त केली. चक्रधर जयंतीच्या पार्श्वभूमीवर आजच्या काळात महानुभाव पंथाचे आचार विचार व स्वामींची सत्वचने समाजहितासाठी अत्यंत पोषक आणि मौल्यवान असल्याचे अनेकांनी सांगितले. इतकेच नव्हे तर नैराश्यातून परावृत्त करीत सन्मानाने जीवन जगण्याचे तत्त्व पंथ सांगत असल्याने कोणीही खरा पंथीय आत्महत्त्येस प्रवृत्त होत नाही, असेही काही महंतांनी सांगितले.बाराव्या शतकात वैदीक धर्माच्या नावाखाली कर्मकांड युक्त धर्माचा पगडा निर्माण झालेला होता. एक प्रकारे चक्रधर स्वामी यांच्या रूपाने महाराष्ट्रात समाज परिवर्तनाची आणि धर्मप्रवर्तनाची लाट आली. गुजरात राज्यातून महाराष्ट्रात परिभ्रमणासाठी आलेल्या स्वामींनी मराठी मुलुख हीच आपली कर्मभूमी मानून तळमळीने व कळकळीने समाजोद्धाराचे व लोकजागरणाचे कार्य केले. ‘सर्व जिवांना धर्माचा, मोक्षाचा व भक्तीचा अधिकार आहे. स्त्री-पुरुष समान असून वर्ण व्यवस्था मानू नका, सत्य-अहिंसेचे पालन करा, मद्य-मांसादी सप्त व्यसनांपासून दूर राहा, असा साध्या सोप्या भाषेत लोकप्रबोधनाचा प्रचार व प्रसार गावागावात जाऊन स्वामी व त्यांच्या शिष्य परिवाराने केला. इतकेच नव्हे तर हिंसेकडे वळालेल्या, भटकलेल्या तरुणांना शांतीचा मार्ग सांगितला. आजच्या काळातील दहशतवादी, व्यसनाधीन व नैराश्यवादी तरुण पिढी बघता पुन्हा एकदा सुंदर व आशावादी जीवनाकडे वळविण्यासाठी चक्रधर स्वामींच्या विचारांची मोठ्या प्रमाणावर मांडणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. नेमकी हीच मांडणी पंथीय महंत करीत आहेत, असे मत अखिल भारतीय महानुभाव युवा परिषदेचे अध्यक्ष, महंत संतोषमुनी शास्त्री कपाटे यांनी व्यक्त केले.