शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
4
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
5
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
6
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
7
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
8
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
9
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
10
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
11
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
12
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
13
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
14
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
15
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
16
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
17
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
18
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
19
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
20
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले

अजंग परिसरात वादळाने नुकसान

By admin | Updated: May 10, 2016 00:30 IST

गारपीट : डाळींब, आंबा, द्राक्ष आदि पिकांना फटका

 वडेल : येथे नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अजंग परिसरातही गारपीट व वादळामुळे पिकांसह शेडनेटचे व रोडनेटवरील पिकांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत आहेत. याबाबतीत नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या गारपीट व वादळामुळे शेतकऱ्यांच्या डाळींब, सिमला मिरची यांसह टमाटा, चारा व कांद्याच्या बीचे (उळे) नुकसान झाल्याचे पाहणीत आढळले आहे.कांद्याचे बी (उळे) वादळामुळे पूर्णत: मातीमोल झाले असून, टमाटा पिकाला तडे गेले आहेत. तसेच सिमला मिरची गळून पडल्याचे चित्र असून, शेडनेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. वडेल येथील दादा सोनवणे व तुषार सोनवणे या शेतकऱ्यांचे शेडनेट फाटले असून, अजंग शिवारातील रामसिंग देवरे यांचे शेडनेट फाडून सिमला मिरची पिकाचे नुकसान झाले. यासंदर्भात अजंग येथील तलाठ्यांना विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही, तर वडेलचे तलाठी नीळकंठ दळवी यांनी नुकसानीबाबत तहसील कार्यालयात माहिती दिल्याचे सांगितले. (वार्ताहर)