शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

कांदाप्रश्नी पिंपळगावी रास्ता रोको

By admin | Updated: June 7, 2016 07:33 IST

काँग्रेस-राष्ट्रवादीचे आंदोलन : मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक ठप्प

पिंपळगाव बसवंत : कांद्याला दोन हजार रुपये भाव द्या, वीजबिल माफ करा, कर्जमाफी द्या आदि मागण्यांसाठी येथील मुंबई-आग्रा महामार्गावर राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वतीने विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व आमदार जितेंद्र आव्हाड तसेच माजी आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीसमोर मुंबई-आग्रा महामार्गावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मुंबई-आग्रा महामार्गावर राष्ट्रवादी-काँग्रेसच्या वतीने सकाळी १० वाजता रास्ता रोको आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी दिलीप बनकर यांनी, शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करत आज रस्त्यावर येऊन शासनाला जागे करण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला आहे. माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी, शासनाला दोन वर्षातच शेतकरी मेटाकुटीस आला असून, उत्पादन खर्चावर आधारित किंमत देणारे सरकार कुठे गेले? हेच भाजपा-शिवसेना सरकार दोन वर्षांपूर्वी घोषणा करत होते. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, या रास्ता रोकोत चौफेर टीकास्त्र सोडत राज्य शासनाचे बाभाडे काढले. सरकार अर्थकारण मोहीम आणत असून, देशाच्या पंतप्रधानांना देशात येण्यास वेळ तर नाहीच; परंतु साधे पालकमंत्र्यांनासुद्धा शेतकऱ्यांसाठी वेळ नाही. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्त्याग्रस्त कुटुंबांना भेट देण्यासाठीसुद्धा वेळ मिळत नाही. मुख्यमंत्री सांगतात आमच्यावर अवलंबून राहू नका. आजची परिस्थिती कांद्याची गंभीर झाली आहे. धार्मिक क्लेश निर्माण करून राजकारण करणाऱ्या या सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. यापुढे प्रत्येक तहसीलदारांना कांदे मारून आंदोलन उभे करायचे असून, आज शिवराज्यभिषेक दिन आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी आजपासून सुरू केली यापुढे आपणही आंदोलनाने या सरकारला धडा शिकवून खाली खेचल्याशिवाय राहणार नसल्याचे आव्हाड यांनी सांगितले.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही शासनावर टीकास्त्र सोडत हे सरकार कोणत्या मुहूर्तावर स्थापन झाले काही कळत नाही, महाराष्ट्रावर सतत संकटं येत आहेत. कोण पक्षात व कोण विरोधात कळत नाही. भूखंडाचे श्रीखंड वाटप करणारे हे सरकार दाळ, चिक्की, स्वेटर, जमीन खाते यांना कांद्याचे काय कळणार. या सरकारमुळे शेतकऱ्यांना कुऱ्हाडी घेऊन बागा तोडण्याची वेळ आली आहे. मेक इन इंडियाचे स्वप्न दाखविणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या भावनांशी काय कदर राहणार आहे. आम्ही ३० हजार रुपये एकरी तत्काळ दिले, यांना साधा कांद्याला हमीभाव देता येत नाही. आम्ही तो घेतल्याशिवाय राहणार नाही व आगामी तीन दिवसात सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना कांदा फेको आंदोलन उभे करून शासनाला जागे करावे, असे विखे पाटील यांनी सांगितले. आजच्या आंदोलनात रवींद्र पगार, राजाराम पानगव्हाणे, अर्जुन बोराडे, अनिल कुंदे, नरहरी झिरवाळ, डॉ. सुधीर तांबे, डॉ. भारती पवार, शोभा मगर, विजयश्री चुंभळे, भास्करराव बनकर, प्रकाश अडसरे, तान्हाजी बनकर, नानासाहेब बोरस्ते, विश्वास मोरे, देवीदास पिंगळे, आमदार जयंत जाधव व निर्मला गावित, डॉ. तुषार शेवाळे, दिगंबर गिते, अर्जुन टिळे, शरद अहेर, अनिल कुंदे, माणिकराव बोरस्ते, प्रकाश अडसरे, प्रेरणा बलकवडे, प्रसाद हिरे, गुरुदेव कांदे, राजेंद्र शिंदे, निवृत्ती धनवटे आदिंसह हजारो शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)