शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

शेतकरी कर्जमुक्तीसाठी १४ आॅगस्टला रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:07 IST

१४ आॅगस्ट रोजी राज्यव्यापी रास्ता रोको व रेल रोको करण्याचा निर्णय शेतकरी सुकाणू समितीने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी राज्य सरकारला दिलेल्या अल्टीमेटमनुसार येत्या १४ आॅगस्टपर्यंत शासनाने निर्णय न घेतल्यास १४ आॅगस्ट रोजी राज्यव्यापी रास्ता रोको व रेल रोको करण्याचा निर्णय शेतकरी सुकाणू समितीने घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे येथे शेतकरी सुकाणू समितीची बैठक होऊन शेतकरी कर्जमुक्तीसाठी आंदोलनाचा अखेरचा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी गेल्या १ जूनपासून सुरू झालेला शेतकऱ्यांचा संप व त्यानंतर दाखल झालेले गुन्हे तसेच नाशिक येथे राज्यव्यापी बैठकीत करण्यात आलेल्या ठरावांवरील कार्यवाहीवर चर्चा करण्यात आली. राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करून एकाही शेतकऱ्याला महिना उलटूनही कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. कर्जमाफी देताना राज्यातील शेतकऱ्यांमध्ये भेदाभेद न करता सरसकट कर्जमुक्ती करण्यात यावी यासाठी पावसाळी अधिवेशनात आमदार बच्चू कडू हे विधानसभेत तर आमदार जयंत पाटील हे विधान परिषदेत ठराव मांडतील, या ठरावाच्या बाजूने पाठिंबा देण्यासाठी सर्व पक्षीय आमदारांना आवाहन करण्यात येईल. जे आमदार किंवा मंत्री या ठरावाच्या बाजूने मतदान करणार नाहीत त्यांना त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकरी फिरू देणार नाहीत, तसेच मंत्र्यांना गावबंदी करण्याचे ठरविण्यात आले. राज्यात एकाच वेळी १४ आॅगस्ट रोजी सर्व राज्य व महामार्गावर चक्काजाम करण्यात येईल, तसेच १५ आॅगस्ट रोजी जिल्ह्याच्या ठिकाणी पालकमंत्र्यांना ध्वजारोहणापासून रोखण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. सुकाणू समितीने घेतलेल्या या निर्णयात राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना सामावून घेण्यासाठी गावोगावी आगामी काळात बैठका, मेळावे घेण्याचे तसेच शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचे ठरविण्यात आले.