शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दररोज उशिरा येणारी बस व वाहकाची अरेरावी नांदगावी चिमुरड्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:50 IST

दररोज उशिरा येणारी बस व वाहकाची अरेरावी यामुळे संतापलेल्या चिमुरड्यांनी मंगळवारी (दि.१९) सायंकाळी येथील पुलावर तब्बल दीड तास रास्ता रोको करून मनात दाटलेल्या उद्रेकाला वाट करून दिली.

ठळक मुद्देरौद्रावतारापुढे नागरीकही अचंबितबस १ ते दीड तास उशिराने येते

नांदगाव : दररोज उशिरा येणारी बस व वाहकाची अरेरावी यामुळे संतापलेल्या चिमुरड्यांनी मंगळवारी (दि.१९) सायंकाळी येथील पुलावर तब्बल दीड तास रास्ता रोको करून मनात दाटलेल्या उद्रेकाला वाट करून दिली.घोषणा देत रस्त्यावर ठाण मांडून आपली कैफियत नागरिकांसमोर मांडतांना मुलांना मारणारा वाहक व केवळ पासधारक असल्याने न थांबता भुर्रकन निघून जाणारी बस यामुळे होणारी नित्याची अवहेलना मुलांनी ठामपणे कथन केली. शाळकरी मुलांच्या या रौद्रावतारापुढे नागरीकही अचंबित झाले.न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पिंप्राळे, जेऊर, हिंगणवाडी, वाखारी येथील शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनी दररोज शाळेत ये जा करत असतात. वरील गावासाठी दोन बसेस सोडण्यात येत असल्याचा दावा आगार व्यवस्थापक यांनी केला. परंतु मुलांनी मोठा आवाज करून हि माहिती चुकीची असल्याचे सांगितले. अनेकदा एकच बस येते. ती ठासून भरल्यानंतर निघून जाते. दरम्यान थांब्यावरची गर्दी बघून दुसºया आगाराच्या किंवा नांदगाव आगाराच्या बसेस थांबत नाहीत. १२ वा. ता भरणाºया शाळेसाठी, सकाळी ११ वा. गावी येणारी बस कित्येकदा १ ते दीड तास उशिराने येते. म्हणून अभ्यास बुडतो. ४.४५ वा.शाळा सुटते. त्यानंतर घरी नेणारी बस सात साडेसात वाजता येते. दीड दोन तास चिमुरडी केविलवाण्या चेहेºयाने बसची वाट बघत थांब्यावर उभी असतात. आलेल्या बसच्या मागे धावतात. रास्ता रोको सुरु झाल्यानंतर पाऊण तासाने व्यवस्थापकांचे आगमन झाले. त्यांनी आपल्याच अडचणी मुलांसमोर मांडायला सुरवात केल्याने उपस्थित मंडळी चिडली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, महेंद्र गायकवाड, अजय पगारे, संजय मोकळ उपस्थित होते.कर्मचारी जुमानत नाहीत वाहक चालक असो की अभियांत्रिकी विभाग असो. ‘मी शिस्त लावण्याचा प्रयत्न करतो पण कर्मचारी जुमानत नाहीत’ असे आगार व्यवस्थापक बेलदार यांचे म्हणणे आहे. या सर्वांची झळ नेहमी प्रवास करणाºया प्रवाशांना बसतेच बसते. पोखरी जळगाव खु, वडाळी टाकली बु, बाणगाव, लोहशिंगवे भालूर आदी ठिकाणाहून माध्यमिक व प्राथमिक शिक्षणासाठी शेकडो विद्यार्थी नांदगावमध्ये येत असतात. त्यासाठी लोकांनी पासेस काढून दिले आहेत. शाळेच्या वेळापत्रकानुसार पोहोचता येत नाही. आणि शाळा सुटल्यावर सायंकाळी घरी लवकर जाता येत नाही अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या विद्यार्थ्यांची समस्या येथे थांबत नाही.