शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

दररोज उशिरा येणारी बस व वाहकाची अरेरावी नांदगावी चिमुरड्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:50 IST

दररोज उशिरा येणारी बस व वाहकाची अरेरावी यामुळे संतापलेल्या चिमुरड्यांनी मंगळवारी (दि.१९) सायंकाळी येथील पुलावर तब्बल दीड तास रास्ता रोको करून मनात दाटलेल्या उद्रेकाला वाट करून दिली.

ठळक मुद्देरौद्रावतारापुढे नागरीकही अचंबितबस १ ते दीड तास उशिराने येते

नांदगाव : दररोज उशिरा येणारी बस व वाहकाची अरेरावी यामुळे संतापलेल्या चिमुरड्यांनी मंगळवारी (दि.१९) सायंकाळी येथील पुलावर तब्बल दीड तास रास्ता रोको करून मनात दाटलेल्या उद्रेकाला वाट करून दिली.घोषणा देत रस्त्यावर ठाण मांडून आपली कैफियत नागरिकांसमोर मांडतांना मुलांना मारणारा वाहक व केवळ पासधारक असल्याने न थांबता भुर्रकन निघून जाणारी बस यामुळे होणारी नित्याची अवहेलना मुलांनी ठामपणे कथन केली. शाळकरी मुलांच्या या रौद्रावतारापुढे नागरीकही अचंबित झाले.न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पिंप्राळे, जेऊर, हिंगणवाडी, वाखारी येथील शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनी दररोज शाळेत ये जा करत असतात. वरील गावासाठी दोन बसेस सोडण्यात येत असल्याचा दावा आगार व्यवस्थापक यांनी केला. परंतु मुलांनी मोठा आवाज करून हि माहिती चुकीची असल्याचे सांगितले. अनेकदा एकच बस येते. ती ठासून भरल्यानंतर निघून जाते. दरम्यान थांब्यावरची गर्दी बघून दुसºया आगाराच्या किंवा नांदगाव आगाराच्या बसेस थांबत नाहीत. १२ वा. ता भरणाºया शाळेसाठी, सकाळी ११ वा. गावी येणारी बस कित्येकदा १ ते दीड तास उशिराने येते. म्हणून अभ्यास बुडतो. ४.४५ वा.शाळा सुटते. त्यानंतर घरी नेणारी बस सात साडेसात वाजता येते. दीड दोन तास चिमुरडी केविलवाण्या चेहेºयाने बसची वाट बघत थांब्यावर उभी असतात. आलेल्या बसच्या मागे धावतात. रास्ता रोको सुरु झाल्यानंतर पाऊण तासाने व्यवस्थापकांचे आगमन झाले. त्यांनी आपल्याच अडचणी मुलांसमोर मांडायला सुरवात केल्याने उपस्थित मंडळी चिडली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, महेंद्र गायकवाड, अजय पगारे, संजय मोकळ उपस्थित होते.कर्मचारी जुमानत नाहीत वाहक चालक असो की अभियांत्रिकी विभाग असो. ‘मी शिस्त लावण्याचा प्रयत्न करतो पण कर्मचारी जुमानत नाहीत’ असे आगार व्यवस्थापक बेलदार यांचे म्हणणे आहे. या सर्वांची झळ नेहमी प्रवास करणाºया प्रवाशांना बसतेच बसते. पोखरी जळगाव खु, वडाळी टाकली बु, बाणगाव, लोहशिंगवे भालूर आदी ठिकाणाहून माध्यमिक व प्राथमिक शिक्षणासाठी शेकडो विद्यार्थी नांदगावमध्ये येत असतात. त्यासाठी लोकांनी पासेस काढून दिले आहेत. शाळेच्या वेळापत्रकानुसार पोहोचता येत नाही. आणि शाळा सुटल्यावर सायंकाळी घरी लवकर जाता येत नाही अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या विद्यार्थ्यांची समस्या येथे थांबत नाही.