शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जिल्ह्यातील धरणांचा साठा अवघा ३० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:15 IST

नाशिक: जिल्ह्यातील २४ मोठ्या आणि मध्यम प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा अवघा ३० टक्के इतकाच असल्याने नागरिकांना पाण्याची काटकसर करावी लागण्याची ...

नाशिक: जिल्ह्यातील २४ मोठ्या आणि मध्यम प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा अवघा ३० टक्के इतकाच असल्याने नागरिकांना पाण्याची काटकसर करावी लागण्याची शक्यता आहे. यंदा एक दिवस आधीच मान्सूनचे आगमन होण्याची शुभवार्ता असली तरी बदलत्या ऋतूचक्रामुळे पावसाची प्रतीक्षा देखील करावी लागत असल्याचा अनुभव असल्याने जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये ५ टक्के साठा कमी असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या दोन वर्षापूवी झालेला दमदार पाऊस तर गतवर्षात अखेरच्या चरणापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणे तृप्त झाली होती. त्यामुळे जिल्ह्याला पाणी टंचाई जाणवणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. परंतू एप्रिल तसेच मे महिन्याच्या मध्यापर्यंत धरणसाठा कमी होऊ लागल्याने काटकसर करण्याची वेळ येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मे महित्यातच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये टँकर सुरू करण्याची वेळ आली आहे. आणखी काही टँकरची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. या कालावधीत उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आले शिवाय उन्हाचा परिणाम देखील पाण्याच्या साठ्यावर झाल्यामुळे टँकर सुरू करण्याची वेळ आली.

गंगागूर, काश्यपी, गौतमी गोदावरी तसेच आळंदी या गंगापूर धरण समूहात सद्यस्थितीत ३४ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक असून मागील वर्षी मे महिन्यात ४० टक्के इतका साठा शिल्लक होता. त्यामुळे शहरातील नागरिकांवर पाणी कपातीचे संकट येण्याची शक्यता आहे. पालखेड तसेच गिरणा खोऱ्यातील मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये ११ टक्के इतका जलसाठा शिल्लक आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण जलसाठा ३० टक्के इतका असून मागील वर्षीच्या तुलनेत साठा पाच टक्क्यांनी कमी आहे.

--इन्फो--

जिल्ह्यातील धरणसाठा

गंगापूर: ४९

काश्यपी: १७

गौतमी गोदावरी:१२

आळंदी: १४

पालखेड:१०

करंजवण:१८

वाघाड:०४

ओझरखेड: १३

पुणेगाव: २८

तिसगाव: १०

दारणा: २५

भावली: २८

मुकणे: १३

वालदेवी: ७२

कडवा:१८

नांदूरमध्यमेश्वर: १००

भोजापूर: ११

चणकापूर: ४०

हरणबारी: ५३

केळझर: २९

नागासाक्या: ०६

गिरणा: ३९

पुनद: १४

माणिकपुंज: ००