शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

राज्यस्तरीय सूर्योदय साहित्य पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:18 IST

नाशिक : साहित्य क्षेत्रातील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने राज्यातील विविध साहित्यकृतींना राजस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. डाॅ विशाल ...

नाशिक : साहित्य क्षेत्रातील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने राज्यातील विविध साहित्यकृतींना राजस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

डाॅ विशाल इंगोले यांच्या माझ्या हयातीचा दाखला या काव्यसंग्रहाला ठाणे येथील रामदास खरे यांच्या आता अटळ आहे या काव्यसंग्रहाला, धुळे येथील प्रेमचंद अहिरराव यांच्या शब्दचित्र या काव्यसंग्रहाला, नांदेड येथील डाॅ योगिनी सातारकर-पांडे यांच्या शब्द जायबंदी होण्याचे दिवस या काव्यसंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे. मुंबई येथील अनुराधा नेरूरकर यांच्या ‘सलणारा सलाम’ या ललित लेखसंग्रहाला जाहीर झाला आहे. जळगाव येथील दीपक तांबोळी यांच्या ‘रंग हळव्या मनाचे’ या कथासंग्रहाला, प्रा. डाॅ. युवराज पवार यांच्या ‘शिकार’ या कथासंग्रहाला, कोल्हापूर येथील डाॅ. श्रीकांत पाटील यांच्या ‘लाॅकडाऊन’ या कादंबरीला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कापडणे (जि. धुळे) येथील रामदास वाघ यांच्या ‘बाहुली माझी लाडकी’ या बालकाव्यसंग्रहाला तर पुणे येथील उर्मिला निनावे यांच्या ‘फुलवाडी’ या बालकाव्यसंग्रहाला, लातूर येथील रसुल पठाण यांच्या ‘निसर्गाशी जुळवू नाते’ या बालकाव्यसंग्रहाला पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत . पुणे येथील संजय ऐलवाड यांच्या ‘बिबट्याचे पिल्लू आणि इतर कथा’ या बालकथासंग्रहाला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. डाॅ. मथू सावंत,ॲड विलास मोरे, सावळीराम तिदमे, साहेबराव पाटील, डी बी. महाजन, प्रवीण लोहार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. जानेवारीत नियोजित पहिले अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी दिली आहे.

इन्फो

नाशिकच्या तिघांचा समावेश

या पुरस्कारांमध्ये सूर्योदय काव्यसरिता पुरस्कार नाशिक येथील अभिषेक नासिककर यांच्या समांतर या काव्यसंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे तर कवयित्री गिरिजा कीर यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय सूर्योदय कथा पुरस्कार नाशिकच्या सप्तर्षी माळी यांच्या ‘फिंद्री’ या कथासंग्रहाला, नाशिक येथील राजेंद्र उगले यांच्या ‘थांब ना रे ढगोबा’ या बालकाव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे.