शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

राज्यस्तरीय बौद्ध हक्क परिषद

By admin | Updated: April 6, 2015 01:29 IST

राज्यस्तरीय बौद्ध हक्क परिषद

नाशिक : समाज परिवर्तनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून एक विज्ञानवादी आणि संवेदनशील समाज उभा केला; परंतु त्यांच्या पश्चाच या समाजाच्या हक्काचा प्रश्न अजूनही कायम असेल तर त्यास तथाकथित नेत्यांची उदासीन भूमिका कारणीभूत आहे. असे असले तरी बौद्धांच्या या अस्मितेच्या लढ्याची साथ सोडणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. याप्रसंगी विविध बारा ठराव संमत करण्यात आले. कर्मवीर दादासाहेब गायकवाड येथे आयोजित राज्यस्तरीय बौद्ध हक्क परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचे संचालक भय्याजी खैरकर, वसंतराव नाईक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रमेश बनसोड, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक अनिल वैद्य, नगरसेवक कविता कर्डक, प्राध्यापक इंदिरा आठवले, बीएमए ग्रुपचे अध्यक्ष मोहन अढांगळे तसेच भिख्युगण उपस्थित होते. बौद्ध हक्क परिषदेप्रसंगी बोलताना बडोले म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाच्या उद्धारासाठी चालविलेल्या चळवळीचे कौतुक पंडित नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांनी केले होते; परंतु याच काळात त्यांना त्यांच्या ध्येयापासून दूर ठेवण्याचे कामही काही विघ्नसंतोषी लोक करीत होते. अशाही परिस्थितीत त्यांनी धर्मांतर करून सामाजिक न्यायाची हाक दिली. या समाजाला आजही आपल्या हक्कासाठी सरकार दरबारी झिजावे लागत असेल तर शासनाचा प्रतिनिधी म्हणून जे काही प्रश्न असतील ते सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी वक्ते अनिल वैद्य यांनी आजच्या सामाजिक स्थितीचे विवेचन करून बौद्ध समाजाला हक्क मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन केले. या परिषदेने धर्मांतरित बौद्धांच्या सवलतींचा मुद्दा उपस्थित केला आहे. नवबौद्धांनी या लढ्यात उतरले पाहिजे. धर्मांतरित बौद्धांच्या बाबतीत अजूनही नोकरीत आणि शाळेत प्रश्न येतो. त्यांच्या दाखल्याचा आणि सवलतीचा प्रश्न निर्माण होत असेल तर संघटित लढ्याची गरज आहे. त्यासाठी हक्काच्या लढ्यात उतरले पाहिजे, असे ते म्हणाले. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन चंद्रकांत गायकवाड यांनी केले. सायंकाळी भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला. (प्रतिनिधी)