शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

राज्यस्तरीय बौद्ध हक्क परिषद

By admin | Updated: April 6, 2015 01:29 IST

राज्यस्तरीय बौद्ध हक्क परिषद

नाशिक : समाज परिवर्तनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून एक विज्ञानवादी आणि संवेदनशील समाज उभा केला; परंतु त्यांच्या पश्चाच या समाजाच्या हक्काचा प्रश्न अजूनही कायम असेल तर त्यास तथाकथित नेत्यांची उदासीन भूमिका कारणीभूत आहे. असे असले तरी बौद्धांच्या या अस्मितेच्या लढ्याची साथ सोडणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. याप्रसंगी विविध बारा ठराव संमत करण्यात आले. कर्मवीर दादासाहेब गायकवाड येथे आयोजित राज्यस्तरीय बौद्ध हक्क परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचे संचालक भय्याजी खैरकर, वसंतराव नाईक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रमेश बनसोड, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक अनिल वैद्य, नगरसेवक कविता कर्डक, प्राध्यापक इंदिरा आठवले, बीएमए ग्रुपचे अध्यक्ष मोहन अढांगळे तसेच भिख्युगण उपस्थित होते. बौद्ध हक्क परिषदेप्रसंगी बोलताना बडोले म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाच्या उद्धारासाठी चालविलेल्या चळवळीचे कौतुक पंडित नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांनी केले होते; परंतु याच काळात त्यांना त्यांच्या ध्येयापासून दूर ठेवण्याचे कामही काही विघ्नसंतोषी लोक करीत होते. अशाही परिस्थितीत त्यांनी धर्मांतर करून सामाजिक न्यायाची हाक दिली. या समाजाला आजही आपल्या हक्कासाठी सरकार दरबारी झिजावे लागत असेल तर शासनाचा प्रतिनिधी म्हणून जे काही प्रश्न असतील ते सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी वक्ते अनिल वैद्य यांनी आजच्या सामाजिक स्थितीचे विवेचन करून बौद्ध समाजाला हक्क मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन केले. या परिषदेने धर्मांतरित बौद्धांच्या सवलतींचा मुद्दा उपस्थित केला आहे. नवबौद्धांनी या लढ्यात उतरले पाहिजे. धर्मांतरित बौद्धांच्या बाबतीत अजूनही नोकरीत आणि शाळेत प्रश्न येतो. त्यांच्या दाखल्याचा आणि सवलतीचा प्रश्न निर्माण होत असेल तर संघटित लढ्याची गरज आहे. त्यासाठी हक्काच्या लढ्यात उतरले पाहिजे, असे ते म्हणाले. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन चंद्रकांत गायकवाड यांनी केले. सायंकाळी भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला. (प्रतिनिधी)