शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
5
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
6
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
7
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
8
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
9
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
10
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
11
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
12
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
13
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
14
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
15
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
16
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
17
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
18
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
19
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
20
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी

राज्यस्तरीय बौद्ध हक्क परिषद

By admin | Updated: April 6, 2015 01:29 IST

राज्यस्तरीय बौद्ध हक्क परिषद

नाशिक : समाज परिवर्तनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून एक विज्ञानवादी आणि संवेदनशील समाज उभा केला; परंतु त्यांच्या पश्चाच या समाजाच्या हक्काचा प्रश्न अजूनही कायम असेल तर त्यास तथाकथित नेत्यांची उदासीन भूमिका कारणीभूत आहे. असे असले तरी बौद्धांच्या या अस्मितेच्या लढ्याची साथ सोडणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. याप्रसंगी विविध बारा ठराव संमत करण्यात आले. कर्मवीर दादासाहेब गायकवाड येथे आयोजित राज्यस्तरीय बौद्ध हक्क परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचे संचालक भय्याजी खैरकर, वसंतराव नाईक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रमेश बनसोड, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक अनिल वैद्य, नगरसेवक कविता कर्डक, प्राध्यापक इंदिरा आठवले, बीएमए ग्रुपचे अध्यक्ष मोहन अढांगळे तसेच भिख्युगण उपस्थित होते. बौद्ध हक्क परिषदेप्रसंगी बोलताना बडोले म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाच्या उद्धारासाठी चालविलेल्या चळवळीचे कौतुक पंडित नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांनी केले होते; परंतु याच काळात त्यांना त्यांच्या ध्येयापासून दूर ठेवण्याचे कामही काही विघ्नसंतोषी लोक करीत होते. अशाही परिस्थितीत त्यांनी धर्मांतर करून सामाजिक न्यायाची हाक दिली. या समाजाला आजही आपल्या हक्कासाठी सरकार दरबारी झिजावे लागत असेल तर शासनाचा प्रतिनिधी म्हणून जे काही प्रश्न असतील ते सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी वक्ते अनिल वैद्य यांनी आजच्या सामाजिक स्थितीचे विवेचन करून बौद्ध समाजाला हक्क मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन केले. या परिषदेने धर्मांतरित बौद्धांच्या सवलतींचा मुद्दा उपस्थित केला आहे. नवबौद्धांनी या लढ्यात उतरले पाहिजे. धर्मांतरित बौद्धांच्या बाबतीत अजूनही नोकरीत आणि शाळेत प्रश्न येतो. त्यांच्या दाखल्याचा आणि सवलतीचा प्रश्न निर्माण होत असेल तर संघटित लढ्याची गरज आहे. त्यासाठी हक्काच्या लढ्यात उतरले पाहिजे, असे ते म्हणाले. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन चंद्रकांत गायकवाड यांनी केले. सायंकाळी भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला. (प्रतिनिधी)