शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

नाशिक, नागपूरच्या मेट्रोसाठी राज्य सरकार आर्थिक वाटा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:16 IST

नाशिकच्या निअेा मेट्रोला पाठबळ नाशिक- केंद्र सरकारने नाशिक आणि नागपूरच्या मेट्रो सेवेकरिता केलेल्या तरतुदीनंतर राज्य सरकार आपला वाटा देईल ...

नाशिकच्या निअेा मेट्रोला पाठबळ

नाशिक- केंद्र सरकारने नाशिक आणि नागपूरच्या मेट्रो सेवेकरिता केलेल्या तरतुदीनंतर राज्य सरकार आपला वाटा देईल काय याबाबत शंका असली तरी यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट निर्वाळा दिला आहे. मेट्रोकरिता राज्य सरकार आपला वाटा नक्कीच देईल, असे त्यांनी आज नाशिकमध्ये सांगितलं.

नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांच्या वार्षिक योजना आढावा बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. गेल्या १ फेब्रुवारीस केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक आणि नागपूरच्या मेट्रो सेवेसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यात राज्य सरकारचा देखील वाटा असणार आहे. परंतु राज्य सरकार आर्थिक सहभाग देईल का, याबाबत शंका घेतली जात होती.

कोरोना महामारीच्या संकटामुळे राज्याच्या उत्पन्नात मोठी तूट आली आहे. मात्र त्यानंतरही मध्यम मार्ग काढून जिल्ह्यांना विकासासाठी निधी दिला आहे. त्यासाठी लोकसंख्या आणि विकास यांचे सूत्र ठरवून निधी वाटप निश्चिती करण्यात आली आहे. त्या अंतर्गतच नंदुरबार जिल्ह्याला १३० कोटी, जळगाव जिल्ह्याला ४०० कोटी, धुळे जिल्ह्याला २१० कोटी तर नाशिक जिल्ह्यासाठी ४७० कोटी रुपयांचा नियोजन निधी मंजूर करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्याला विविध शीर्षांखाली ८७० कोटी रुपयांचा निधी देताना नियोजन वाटपात समानता आणण्याचा प्रयत्न केल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना राबवली तसेच पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांचं कर्ज अवघे दोन टक्के व्याजाने देण्यात आले असे सांगतानाच अजित पवार यांनी दिल्लीत कृषी कायद्यावरून सुरू असलेले शेतकरी आंदोलन थांबविण्यासाठी केंद्र शासनाने त्वरित हस्तक्षेप करावा, त्याचबरोबर मार्ग काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी दोन पावलं मागे घ्यावीत, असं आवाहनही पवार यांनी केले.