शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

दोडीत छावण्या सुरू करा

By admin | Updated: June 27, 2014 00:16 IST

दोडीत छावण्या सुरू करा

 

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यात सलग चौथ्या वर्षीही पाऊस नसल्याने चारा, पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पशुधन वाचविण्यासाठी तालुक्यातील दोडी परिसरात जनावरांसाठी छावण्या सुरू करण्याची मागणी शेतकरी दोडीचे सरपंच एकनाथ आव्हाड यांनी केली आहे. शासनाने सिन्नर टंचाईग्रस्त तालुका म्हणून जाहीर केला आहे. तालुक्यातील पीक आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आहे. सलग तीन वर्षांपासून पाऊस झाला नसल्याने तीन वर्षांतील खरीप, रब्बी व उन्हाळी असे नऊ हंगाम जवळपास वाया गेले आहेत.धरणे, बंधारे व विहिरींसह सर्वच पाण्याचे स्रोत कोरडेठाक झाले आहेत. जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने शेतीसाठी सोडाच; परंतु पिण्यासाठीही पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पशुधन सांभाळणे कठीण झाले आहे. शासनाने पशुधन वाचविण्यासाठी तालुक्यात चार ते पाच ठिकाणी जनावरांच्या छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांकडील चारा संपुष्टात आला असून, सध्या खरिपाची तयारी सुरू आहे. मात्र पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांकडील चारा शिल्लक रहाणार नाही. पुढील काही दिवसांत पाऊस पडल्यावर खरिपाच्या पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना बैलांना जास्तीच्या चाऱ्याची गरज भासते. परंतु विकत चारा घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसेच नसल्याने शेतकरी पशुधन सांभाळण्यासाठी चारा कोठून उपलब्ध करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. (वार्ताहर)