शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

स्थायी समितीच्या ठरावाला ‘किंमत’ उरणार?

By admin | Updated: October 9, 2015 00:18 IST

तीन कोटींचा केला ठेका रद्द

नाशिक : नुकत्याच झालेल्या सिंहस्थ कुंभमेळादरम्यान साधुग्राममधील महापालिकेच्या ठेक्याबाबत ई-निविदा पद्धतीबाबत मोहोळ उठल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता जिल्हा परिषदेच्या तीन कोटी रुपयांच्या सौर पथदीप खरेदीचा ठेकाही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत ग्रामीण भागातील जवळपास ३०० ग्रामपंचायतींमध्ये सौर पथदीप पुरवठा करण्याची योजना असून, त्यासाठी पाच महिन्यांपूर्वीच दरकरार पद्धतीने राजस्थानच्या एका कंपनीला ठेका देण्यात आला होता. प्रत्यक्षात राजस्थानच्या जयपूरस्थित संबंधित कंपनीने वेळेत सौर पथदीपांचा पुरवठा न केल्याने पाच महिन्यांनंतर या कंपनीचा दरकरार संपुष्टात आणून नव्याने ई-निविदा पद्धतीचा अवलंब करण्यात येऊन तीन कोटींच्या सौर पथदीप खरेदीसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यात राजस्थान, गुजरातसह अन्य राज्यांतील व महाराष्ट्रातील पाच बड्या कंपन्यांनी यासाठी स्पर्धा केली. त्यात गुजरात स्थित एका कंपनीने चक्क अंदाजपत्रकीय रक्कमेच्या २८ टक्केन्यूनतम दराने निविदा भरल्याने याच कंपनीला सौर पथदीप पुरविण्याचा ठेका मिळणार हे जवळपास नक्की झाले. त्यामुळेच इतक्या कमी दराने कसा ठेका परवडणार, त्याला गुणवत्ता राहणार काय? असे प्रश्न उपस्थित करून नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा ठेका पुन्हा रद्द करण्याचा ठराव झाला. मुळात स्थायी समितीला ५० लाखांपर्यंत कामे मंजूर करण्याचा अधिकार असताना चक्क तीन कोटींचा ठेका कसा रद्द होऊ शकतो? शिवाय कंपनीने २८ टक्केन्यूनतम दराने ठेका भरल्याने जिल्हा परिषदेला २२,४७५ ऐवजी २७७५ असे किमान ३०० जादाचे पथदीप ग्रामीण भागात बसविण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच एका सौर पथदीप खरेदीमागे जवळपास एक हजार रुपये बचत होणार असल्याने चक्क दोन लाख ८० हजारांची जिल्हा परिषदेची बचतही होणार असल्याचे समजते. दुसरीकडे नियमानुसार हा ठेका न्यूनतम दर आलेल्या कंपनीस न दिल्यास संबंधित कंपनी न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहेत. (प्रतिनिधी)