शहरं
Join us  
Trending Stories
1
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
2
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
3
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
4
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
5
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
6
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
7
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
8
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई
9
मुंबई: ठाकरे गटाच्या पेडणेकर, दुधवडकरांसह आठ जणांची उमेदवारी धोक्यात; प्रभाग आरक्षणाचा फटका
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
11
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
12
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
13
चातुर्मासाची शेवटची संकष्ट चतुर्थी: गणेश कल्याण करेल, शुभ घडेल; पाहा, व्रत विधी-चंद्रोदय वेळ
14
५ राजयोगात संकष्ट चतुर्थी: १० राशींची इच्छा पूर्ण, मान-सन्मान; यश-कीर्ती-लाभ, शुभ-वरदान काळ!
15
VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल
16
मलायकाला झालंय तरी काय? अरबाज खानने लेकीला आणलं घरी, अभिनेत्रीने स्टोरी शेअर करत...
17
India Vs China: भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
18
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?
19
घरबसल्या महिन्याला ₹९२५० ची कमाई करुन देणारी पोस्टाची स्कीम! पण एक चूक पडेल भारी, बसू शकतो ३० हजारांचा फटका
20
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टी २५ हजारांच्या वर; Cipla, Zomato, Dr Reddy's मध्ये खरेदी

कोरेानाकाळात सेवा बजावलेल्या एस.टी. चालकांना ३०० रुपयांचे प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:15 IST

नाशिक : कोरोनाचा प्रकोप वाढत असताना, परप्रांतीय मजुरांचे लोंढे गावाकडे परतू लागले असताना, या मजुरांना त्यांच्या जिल्ह्याच्या सीमारेषेवर सोडण्यासाठी ...

नाशिक : कोरोनाचा प्रकोप वाढत असताना, परप्रांतीय मजुरांचे लोंढे गावाकडे परतू लागले असताना, या मजुरांना त्यांच्या जिल्ह्याच्या सीमारेषेवर सोडण्यासाठी एस. टी. महामंडळाने सेवा बजावली. मागील वर्षी मे, जून आणि ऑगस्ट महिन्यांत परप्रांतीय मजुरांची वाहतूक करणाऱ्या चालक-वाहकांना ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा महामंडळाने केली होती. त्यानुसार विभागातील चालकांना सेवेचे मोल वितरित करण्यात आले आहे.

कोरोनाच्या काळात सर्वाधिक आर्थिक फटका परिवहन महामंडळाला बसला. त्यांच्या वेतनाचाच नव्हे तर महामंडळ अस्तित्वात राहणार की नाही इतका मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अशाही परिस्थितीत महामंडळाने अत्यावश्यक सेवा म्हणून रुग्णालयात जाणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी कोरोना काळात सेवा दिली. कोरेाना ऐन जोमात असल्याने परप्रांतीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या गावांमध्ये सोडण्यासाठी चालकांनी जीव धोक्यात घालून प्रवासी सेवा दिली. छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक, राजस्थान या राज्यांच्या सीमारेषेपर्यंत चालकांनी परप्रांतीय मजुरांना नेऊन सोडले. प्रवासाच्या काळात चालकांना अनेक प्रसंगांचा सामना करावा लागला. एवढे करूनही त्यांनी या काळात पूर्ण क्षमतेने सेवा दिली. त्यांना या कामासाठी महामंडळाने ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता मंजूर केला होता. या प्रोत्साहन अनुदानाचे जिल्ह्यात वाटप करण्यात आले.

--इन्फो--

११३ पेक्षा अधिक कर्मचारी पॉझिटिव्ह

कोरोनाच्या काळात सेवा बजावताना किमान तीन महिन्यांच्या कालावधीत शंभरपेक्षा अधिक चालक तसेच काही अधिकारी पाॅझिटिव्ह आल्याचे सांगितले जाते. कोरोनाचे रुग्ण अधिक वाढत असताना प्रवाशांच्या संपर्कात आल्याने चालक, वाहक तसेच काही अधिकारी बाधित झाले. परराज्यांतील सीमारेषांपर्यंत प्रवासी सेवा देण्याबरोबरच मुंबईत बेस्टसाठीही नाशिक विभागातील कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. त्यामुळे शंभरपेक्षा अधिक कर्मचारी बाधित झाले. जिवावर उदार होऊन या कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली.

--इन्फो--

कोरोना जोमात असताना केवळ तीन महिन्यांसाठी ३०० रुपये प्रोत्साहन योजना राबविण्यात आली. त्यामुळे या काळात अनेक चालकांनी मिळालेली सेवा बजावली. त्याचा लाभ चालक, वाहकांना झाला. परंतु पुढे या योजनेला वाढ देण्यात आली नाही. वास्तविक काेरोनाचा प्रभाव अजूनही कमी झालेला नसतानाही चालक-वाहकांना विनामोबदला धोका पत्करून काम करावे लागत आहे. जवळपास सर्व बसेस सुरू झालेल्या आहेत. प्रवासी वाहतूक वाढत असली तरी धोकाही तितकाच वाढत आहे.