शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

कोरेानाकाळात सेवा बजावलेल्या एस.टी. चालकांना ३०० रुपयांचे प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:15 IST

नाशिक : कोरोनाचा प्रकोप वाढत असताना, परप्रांतीय मजुरांचे लोंढे गावाकडे परतू लागले असताना, या मजुरांना त्यांच्या जिल्ह्याच्या सीमारेषेवर सोडण्यासाठी ...

नाशिक : कोरोनाचा प्रकोप वाढत असताना, परप्रांतीय मजुरांचे लोंढे गावाकडे परतू लागले असताना, या मजुरांना त्यांच्या जिल्ह्याच्या सीमारेषेवर सोडण्यासाठी एस. टी. महामंडळाने सेवा बजावली. मागील वर्षी मे, जून आणि ऑगस्ट महिन्यांत परप्रांतीय मजुरांची वाहतूक करणाऱ्या चालक-वाहकांना ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा महामंडळाने केली होती. त्यानुसार विभागातील चालकांना सेवेचे मोल वितरित करण्यात आले आहे.

कोरोनाच्या काळात सर्वाधिक आर्थिक फटका परिवहन महामंडळाला बसला. त्यांच्या वेतनाचाच नव्हे तर महामंडळ अस्तित्वात राहणार की नाही इतका मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अशाही परिस्थितीत महामंडळाने अत्यावश्यक सेवा म्हणून रुग्णालयात जाणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी कोरोना काळात सेवा दिली. कोरेाना ऐन जोमात असल्याने परप्रांतीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या गावांमध्ये सोडण्यासाठी चालकांनी जीव धोक्यात घालून प्रवासी सेवा दिली. छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक, राजस्थान या राज्यांच्या सीमारेषेपर्यंत चालकांनी परप्रांतीय मजुरांना नेऊन सोडले. प्रवासाच्या काळात चालकांना अनेक प्रसंगांचा सामना करावा लागला. एवढे करूनही त्यांनी या काळात पूर्ण क्षमतेने सेवा दिली. त्यांना या कामासाठी महामंडळाने ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता मंजूर केला होता. या प्रोत्साहन अनुदानाचे जिल्ह्यात वाटप करण्यात आले.

--इन्फो--

११३ पेक्षा अधिक कर्मचारी पॉझिटिव्ह

कोरोनाच्या काळात सेवा बजावताना किमान तीन महिन्यांच्या कालावधीत शंभरपेक्षा अधिक चालक तसेच काही अधिकारी पाॅझिटिव्ह आल्याचे सांगितले जाते. कोरोनाचे रुग्ण अधिक वाढत असताना प्रवाशांच्या संपर्कात आल्याने चालक, वाहक तसेच काही अधिकारी बाधित झाले. परराज्यांतील सीमारेषांपर्यंत प्रवासी सेवा देण्याबरोबरच मुंबईत बेस्टसाठीही नाशिक विभागातील कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. त्यामुळे शंभरपेक्षा अधिक कर्मचारी बाधित झाले. जिवावर उदार होऊन या कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली.

--इन्फो--

कोरोना जोमात असताना केवळ तीन महिन्यांसाठी ३०० रुपये प्रोत्साहन योजना राबविण्यात आली. त्यामुळे या काळात अनेक चालकांनी मिळालेली सेवा बजावली. त्याचा लाभ चालक, वाहकांना झाला. परंतु पुढे या योजनेला वाढ देण्यात आली नाही. वास्तविक काेरोनाचा प्रभाव अजूनही कमी झालेला नसतानाही चालक-वाहकांना विनामोबदला धोका पत्करून काम करावे लागत आहे. जवळपास सर्व बसेस सुरू झालेल्या आहेत. प्रवासी वाहतूक वाढत असली तरी धोकाही तितकाच वाढत आहे.