शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

एस.टी. कर्मचाऱ्यांना वेळेवर ना पगार मिळतो, ना वैद्यकीय बिले मिळतात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:17 IST

संसर्गजन्य आजारासाठी बिले सादर केल्यानंतर तर त्याबाबत प्रचंड संशयाने पाहिले जात असल्याचा कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे. त्यांना अगदी जेमतेम बिल ...

संसर्गजन्य आजारासाठी बिले सादर केल्यानंतर तर त्याबाबत प्रचंड संशयाने पाहिले जात असल्याचा कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे. त्यांना अगदी जेमतेम बिल मिळते, तेही सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरच. सध्या तर आर्थिक अडचण असल्यामुळे वैद्यकीय देयके मिळणेदेखील कठीण झाले आहे. कमीत कमी आठ ते जास्तीत जास्त वर्षभराचा कालावधी बिले मिळण्यासाठी लागतो. त्यातही काही टक्के आधी आणि उर्वरित नंतर दिले जाते.

--इन्फो--

आठ ते बारा महिन्यांचा विलंब

वैद्यकीय बिले सादर करण्याची प्रक्रियाच मोठी अडचणीची आणि वेळखाऊ आहे. डॉक्टर भेटण्यावर पुढचे सर्व अवलंबून आहे. त्यातही अनेक कागदपत्रे आधीच नाकारली जातात. त्यामुळे जमेल तेवढी धावाधाव करून मध्यवर्ती कार्यालयाकडे बिले पाठविली जातात. तेथून ती येण्यास आठ ते बारा महिन्यांचा कालावधी नक्की लागतो.

--इन्फो--

विलंबाबाबत अधिकाऱ्यांचे मौन

कर्मचाऱ्यांना गंभीर आणि किरकोळ अशा आजारासाठी वैद्यकीय बिले दिली जात असली तरी ती कधी मिळतील, याची शाश्वती नसते. याविषयी येथील कामगार अधिकारी तसेच विभागीय लेखा अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी याबाबत काहीही सांगता येणार नसल्याचे सांगितले. बिले सध्या दिली जातात की नाही, किंवा किती बिले पडून आहेत, याची माहिती देण्यात आली नाही.

--कोट--

उपचारावरील खर्च कोठून आणायचा,

दुचाकीवर मोठा अपघात झाला होता. त्यामुळे महिनाभर रुग्णालयात उपचार त्यानंतर घरीच थांबणे भाग पडल्याने वैद्यकीय उपचार सुरूच होते. याबाबतचे बिल सादर केल्यानंतर त्यामध्ये मोठी कपात करण्यात आली. वैद्यकीय बिल मिळेल, असे वाटले होते; परंतु तब्बल दीड वर्ष वाट पहावी लागली.

- एक कर्मचारी, एस.टी. महामंडळ.

गेल्या आठ महिन्यांपासून वैद्यकीय बिल अडकून पडले आहे. एकतर गेली दीड वर्षे केारेानामुळे वेतनाची अडचण झालेली आहे. ड्युटी करूनही हाती काहीच पडले नाही. या काळात कर्ज झाले. आजारामुळे ते अधिक वाढले. महामंडळाकडे बिल सादर करून आठ महिने झाले आहेत; मात्र त्यात त्रुटी सांगितल्या जात आहेत. बिल मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे.

- एक कर्मचारी, एस.टी. महामंडळ.

--इन्फो--

पगाराची अनिश्चितता कायम

राज्य शासनाच्या निधीवर गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले आहे. शासनाने एकदा ६०० तर एकदा ९०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यामुळे दोन महिन्यांचे वेतन मिळाले. आता सप्टेंबरच्या महिन्यातील वेतनाचे काय होते, याबाबत आताच कर्मचाऱ्यांच्या मनात शंका उपस्थित झाली आहे.

वेतन अदा केले जाईल, असे महामंडळाकडून सांगितले जात असले तरी ते केव्हा मिळेल, याची शाश्वती नसते. दरमहा ७ तारखेला पगार दिला जातो. मागील काही महिन्यांपासून पगाराची तारीख टळून जात आहे. वैद्यकीय बिलाबाबतची अनिश्चिततेची त्यात भर पडली आहे.

--इन्फो--

जिल्ह्यातील एकूण आगार :१३

चालक: १९००

वाहक: १८००

अधिकारी : ६५

कर्मचारी १७३५