शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

मुख्यमंत्र्यांकडून नाशिककरांची बोळवण

By admin | Updated: February 10, 2016 23:32 IST

टीडीआर धोरण बदलण्यास नकार

नाशिक : राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या टीडीआर धोरणात कितीही त्रुटी असल्या तरी मुख्यमंत्र्यांनी त्यात बदल करण्यास स्वच्छ शब्दात नकार दिला आहे. कमी रूंदीच्या रस्त्यालगत बंगलेच उभारले पाहिजे, हेच सरकारचे धोरण असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या स्थापत्य महासंघाला परत पाठविले. त्यामुळे आता न्यायालयात दाद मागण्याबरोबरच रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्य शासनाने अलीकडेच टीडीआर धोरण जाहीर करताना कमी रूंदीच्या रस्त्यालगत म्हणजे साडेसहा ते सात मीटर रस्त्यालगत टीडीआर वापरण्यास मनाई केली आहे. त्याच प्रमाणे मोठ्या भूखंडासाठी मात्र अधिक टीडीआर अनुज्ञेय करण्यात आले आहेत. नाशिकमध्ये ८० टक्के छोटे प्लॉट विकसित केले जातात. मात्र, शासनाच्या निर्णयाचा फटका छोट्या प्लॉटधारकांना बसणार असल्याचे आर्किटेक्ट इंजिनिअर्स आणि विकासकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात स्थापत्य महासंघाचे सदस्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी मुंबईस गेले होते. त्यांच्याकडे कैफियत मांडल्यानंतर त्यांनी निराकरण करण्याचे साधे आश्वासनही दिले नाही. उलट कमी रूंदीचे रस्त्यालगत टीडीआर वापरूच नये, तेथे बंगले बांधावेत आणि जादा रूंद रस्त्यालगत इमारती उभ्या राहाव्या हेच सरकारचे धोरण आहे, असे त्यांनी सांगितले. या प्रकारामुळे छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होईल असे निदर्शनास आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी छोट्या व्यावसायिकांनी एकत्र येऊन मोठे प्रकल्प उभारावे कारण मोठ्या प्रकल्पांना अधिक सवलत देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या या धोरणावर स्थानिक आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप भूमिका मांडू शकले नाही, असेही महासंघाच्या प्रतिनिधींनी सांगितले. विजय सानप, सुरेश पाटील, रामेश्वर मालाणी, अविनाश शिरोडे, प्रदीप काळे, ज्ञानेश्वर गोडसे, आर. के. सिंग, ऋषीकेश पवार, हेमंत धात्रक, रसिक बोथरा, योगेश महाजन यांच्यासह अन्य प्रतिनिधींचा मुख्यमंत्र्यांना भेटणाऱ्यांमध्ये समावेश होता.