शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

जिल्ह्यात यंदा सोयाबीन बियाणाचा तुटवडा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 23:31 IST

नाशिक : गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे ऐन फुलोऱ्यात आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जिल्ह्यात यावर्षी सोयाबीन पिकाच्या बियाणांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ज्या शेतकºयाकडे मागील वर्षीचे सोयाबीन शिल्लक आहे त्यांनी त्याचा बियाणासाठी वापर करावा यासाठी जागृती केली जात आहे.

नाशिक : गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे ऐन फुलोऱ्यात आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जिल्ह्यात यावर्षी सोयाबीन पिकाच्या बियाणांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ज्या शेतकºयाकडे मागील वर्षीचे सोयाबीन शिल्लक आहे त्यांनी त्याचा बियाणासाठी वापर करावा यासाठी जागृती केली जात आहे. जिल्ह्यात आजमितीला आवश्यक असलेल्या बियाणांपैकी ६८ टक्के बियाणे उपलब्ध असल्याचा दावा जिल्हा कृषी विभागाकडून केला जात आहे.जिल्ह्यात सोयाबीनचे ५९ हजार ३४८ हेक्टर इतके क्षेत्र आहे. गतवर्षी प्रत्यक्ष १ लाख २१०० हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती.गतवर्षी पाऊस चांगला असल्याने सोयाबीनचे उत्पादन भरघोस येईल, असा अंदाज होता. मात्र मक्यापाठोपाठ सोयाबीनवर झालेला लष्करी अळीचा प्रादुर्भाव आणि पीक ऐन फुलोºयात असताना झालेली अतिवृष्टी याचा सोयाबीनच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. अनेक शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले. नैसर्गिक संकटातून ज्यांचे पीक तरले त्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला. काहींना तर एकरी ३ ते ४ क्विंटल इतकेच उत्पादन मिळाले. यामुळे सोयाबीनच्या एकूण उत्पादनावर परिणाम झाला. दरवर्षीच्या एकूण उत्पादनावर पुढील वर्षाच्या हंगामाचे नियोजन अवलंबून असते. मागील वर्षी उत्पादनात झाल्यामुळे यावर्षी सोयाबीनच्या बियाणांचा तुटवडा निर्माण होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.यावर्षी सोयाबीनसाठी ७५ हजार ५०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले असून, त्यासाठी २२ हजार ६५० क्विंटल बियाणांची आवश्यकता आहे. जिल्ह्यात आजमितीला १५ हजार ३२८ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. म्हणजे एकूण आवश्यक बियाणांच्या ६८ टक्के बियाणे उपलब्ध असल्याचा कृषी विभागाचा दावा आहे.यावर्षी चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यामुळे मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षी सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रस्तावित क्षेत्रासाठीच बियाणे कमी असल्याने वाढीव क्षेत्रासाठी बियाणे कसे उपलब्ध होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.-----------------------------------शेतकºयांमध्ये जागृतीमागील वर्षीचे सोयाबीन शिल्लक आहे अशा शेतकºयांनी त्याचाच बियाणे म्हणून वापर करावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. यासाठी जागृती केली जात आहे. अशा शेतकºयांची यादीही केली जात आहे. सोयाबीनचे बियाणे कमी पडले तर शेतकºयांनी पर्यायी पिकांची लागवड करावी, असे आवाहन केले जात आहे. सोयाबीनला पर्याय म्हणून अनेक शेतकरी मका पिकाची निवड करण्याची शक्यता आहे. पर्यायाने मक्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक