शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
4
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
5
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
6
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
7
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
8
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
9
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
10
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
11
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
12
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
13
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
14
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
15
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
16
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
17
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
18
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
19
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
20
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
Daily Top 2Weekly Top 5

पेरणी की लावणी यावरून शेतकरी व बॅँकेत जुंपली

By admin | Updated: August 13, 2014 00:40 IST

पीकविमा योजनेच्या वाढीव मुदतीवरच प्रश्नचिन्ह

पेठ : शासनाने जाहीर केलेल्या खरीप हंगामासाठी राष्ट्रीय कृषी पीकविमा योजनेची मुदत वाढवली असली तरीही पेठ तालुक्यात मात्र पीकविमा योजनेसाठी पेरणी की लावणी यावरून शेतकरी व जिल्हा बँक प्रशासनात चांगलीच जुंपली आहे. एकीकडे बँक प्रशासन विम्याची रक्कम भरून घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात असताना बँक प्रशासन मात्र शासनाच्या अध्यादेशाचा आधार घेत विमा पेरणीसाठी दिला जात असून, भात व नागलीच्या लावणीचा विमा घेतला जात नसल्यावर ठाम आहे़आदिवासी भागात साधारण मे महिन्याच्या अखेरीस अथवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भात व नागलीच्या बियाणाची पेरणी केली जाते़ पेरणी केलेल्या क्षेत्राचा दरवर्षी ३१ जुलैअखेर शेतकऱ्यांनी कोणत्याही सहकारी अथवा राष्ट्रीयकृत बँकेत विमा उतरवणे आवश्यक असते़ त्याप्रमाणे पेठ तालुक्यातील जवळपास अडीच हजार शेतकऱ्यांनी ८ लक्ष ४८ हजार २१४ रुपये विम्याचा हप्ता नाशिक जिल्हा बँकेत भरणा केला़ त्यानंतर शासनाने याची मुदत १६ आॅगस्टपर्यंत वाढवली़ मात्र आदेशात वाढीव मुदतीचा लाभ केवळ १ ते १६ आॅगस्टदरम्यान पेरणी केलेल्या पिकांवरच लागू असल्याने बँक प्रशासनाने आॅगस्ट महिन्यात लावणी केलेल्या पिकांवरील विमा रक्कम स्वीकारण्यास नकार दिला़ तर शेतकऱ्यांनी मात्र उशिराने पेरणी झाल्याने आॅगस्ट महिन्यात लावणी केलेल्या पिकांनाही विमा संरक्षण द्यावे अशी मागणी केली़ यामुळे पीकविमा योजना ही पेरणी की लावणी यावर तालुक्यात चांगलाच खल सुरू आहे. यामुळे सामान्य शेतकरी मात्र चांगलाच बुचकळ्यात सापडला आहे़