शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:14 IST

शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी नाशिक : चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील अनेक आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीस आलेला ...

शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी

नाशिक : चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील अनेक आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीस आलेला केशर, हापूस आंबा वादळामुळे गळून पडल्याने त्याचे नुकसान झाले आहे. विशेषत: आदिवासी भागात त्याचे प्रमाण अधिक असल्याने या शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

औषध मिळत नसल्याने नाराजी

नाशिक : शहरातील विविध भागातील मेडिकल दुकानांमध्ये अनेक औषधे मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. काही नागरिक औषधांसाठी वारंवार दुकानांच्या चकरा मारत आहेत. पण त्यांच्या पदरी निराशा पडते. राज्य शासनाने याबाबत योग्य ती कार्यवाही करून औषधांचा साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

लस मिळत नसल्याने नाराजी

नाशिक : लसीकरण केंद्रांवर वारंवार चकरा मारूनही लस मिळत नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक नागरिक सकाळीच लसीकरण केंद्रांवर रांगा लावतात. पण लसींचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने अनेकांना माघारी फिरावे लागते. याबाबत काहीवेळा कर्मचाऱ्यांसमवेत नागरिकांचे वादही होतात.

किरकोळ विक्रेत्यांसमोर समस्या

नाशिक : लॉकडाऊनमुळे बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक बंद झाल्याने शहरातील किरकोळ भाजी विक्रेत्यांना माल मिळणे मुश्किल झाले आहे. या व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या बांधावर आपला मोर्चा वळविला आहे. पण एकाच शेतकऱ्याकडे सर्व भाजीपाला मिळत नसल्याने त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच या व्यापाऱ्यांची मागणी कमी असल्यामुळे त्यांना माल देणे शेतकऱ्यांनाही परवडत नसल्याने भाजी बाजारातील विक्रेत्यांची संख्या कमी झाली आहे.

शहरात अवैध मद्यविक्री जोरात

नाशिक : लॉकडाऊनमुळे मद्यविक्रीची दुकाने बंद असल्याने अवैध मद्यविक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक भागात सर्रासपणे अवैध मद्य विक्री केली जाते. पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. अवैध मद्यविक्रीला पोलिसांनी आळा घालावा अशी मागणी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणे पोलिसांना माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हॉटेल व्यावसायिकांसमोर विविध अडचणी

नाशिक : मागील वर्षापासून अडचणीत सापडलेल्या हॉटेल उद्योगाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही व्यावसायिकांनी तर हॉटेल बंद करणे पसंत केले आहे. हॉटेलचा मेंटेनन्स आणि स्टाफ सांभाळणे अनेकांना कठीण झाले आहे. लॉकडाऊन उघडल्यानंतरही ग्राहक येतात की नाही याबाबतही शासंकता व्यक्त केली जात असल्याने सध्यातरी पर्यायी व्यवसाय करण्याचा विचार अनेकजण करीत आहेत.