शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:13 IST

शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी नाशिक : चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील अनेक आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीस आलेला ...

शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी

नाशिक : चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील अनेक आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीस आलेला केशर, हापूस आंबा वादळामुळे गळून पडल्याने त्याचे नुकसान झाले आहे. विशेषत: आदिवासी भागात त्याचे प्रमाण अधिक असल्याने या शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

औषध मिळत नसल्याने नाराजी

नाशिक : शहरातील विविध भागातील मेडिकल दुकानांमध्ये अनेक औषधे मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. काही नागरिक औषधांसाठी वारंवार दुकानांच्या चकरा मारत आहेत. पण त्यांच्या पदरी निराशा पडते. राज्य शासनाने याबाबत योग्य ती कार्यवाही करून औषधांचा साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

लस मिळत नसल्याने नाराजी

नाशिक : लसीकरण केंद्रांवर वारंवार चकरा मारूनही लस मिळत नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक नागरिक सकाळीच लसीकरण केंद्रांवर रांगा लावतात. पण लसींचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने अनेकांना माघारी फिरावे लागते. याबाबत काहीवेळा कर्मचाऱ्यांसमवेत नागरिकांचे वादही होतात.

किरकोळ विक्रेत्यांसमोर समस्या

नाशिक : लॉकडाऊनमुळे बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक बंद झाल्याने शहरातील किरकोळ भाजी विक्रेत्यांना माल मिळणे मुश्किल झाले आहे. या व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या बांधावर आपला मोर्चा वळविला आहे. पण एकाच शेतकऱ्याकडे सर्व भाजीपाला मिळत नसल्याने त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच या व्यापाऱ्यांची मागणी कमी असल्यामुळे त्यांना माल देणे शेतकऱ्यांनाही परवडत नसल्याने भाजी बाजारातील विक्रेत्यांची संख्या कमी झाली आहे.

शहरात अवैध मद्यविक्री जोरात

नाशिक : लॉकडाऊनमुळे मद्यविक्रीची दुकाने बंद असल्याने अवैध मद्यविक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक भागात सर्रासपणे अवैध मद्य विक्री केली जाते. पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. अवैध मद्यविक्रीला पोलिसांनी आळा घालावा अशी मागणी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणे पोलिसांना माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हॉटेल व्यावसायिकांसमोर विविध अडचणी

नाशिक : मागील वर्षापासून अडचणीत सापडलेल्या हॉटेल उद्योगाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही व्यावसायिकांनी तर हॉटेल बंद करणे पसंत केले आहे. हॉटेलचा मेंटेनन्स आणि स्टाफ सांभाळणे अनेकांना कठीण झाले आहे. लॉकडाऊन उघडल्यानंतरही ग्राहक येतात की नाही याबाबतही शासंकता व्यक्त केली जात असल्याने सध्यातरी पर्यायी व्यवसाय करण्याचा विचार अनेकजण करीत आहेत.