शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

स्त्रियांच्याच नव्हे, तर संपूर्ण मराठी साहित्यात ‘स्मृतिचित्रे’ला मोलाचे स्थान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:11 IST

नाशिक : लक्ष्मीबाई टिळक या आत्मचरित्र लिहिणाऱ्या मराठीतील पहिल्या लेखिका आहेत. ‘स्मृतिचित्रे’ या त्यांच्या आत्मचरित्राला केवळ स्त्रियांच्याच नव्हे, तर ...

नाशिक : लक्ष्मीबाई टिळक या आत्मचरित्र लिहिणाऱ्या मराठीतील पहिल्या लेखिका आहेत. ‘स्मृतिचित्रे’ या त्यांच्या आत्मचरित्राला केवळ स्त्रियांच्याच नव्हे, तर एकूण मराठी साहित्यात मोलाचे स्थान असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक एकनाथ पगार यांनी नमूद केले.

सावानाच्या वतीने आयोजित शब्दजागरमध्ये लक्ष्मीबाई टिळक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘स्मृतिचित्रे’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी पारंपरिक रीतिरिवाजात वाढलेल्या लक्ष्मीबाई यांचे माहेरचे नाव मनकर्णिका गोखले होते. त्यांचे लग्न त्यांच्या वयाच्या अकराव्या वर्षी नारायण वामन टिळक यांच्याशी झाले. लग्नानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई टिळक असे झाले. घरातील रूढी, परंपरा, चालीरीतींचा पगडा लक्ष्मीबाईंवर बालपणापासूनच होता. त्यामुळे त्या जास्त शिक्षण घेऊ शकल्या नाहीत. लग्न झाल्यावर नारायण टिळकांनी त्यांना जमेल त्या वेळेत स्वत: शिक्षण दिले. ‘स्मृतिचित्रे’ या त्यांच्या गाजलेल्या आत्मचरित्रात त्यांनी या त्यांच्यावर झालेल्या ख्रिश्चन प्रभावाचे वर्णन केले आहे. नारायणराव टिळक हे सदसद्विवेकी बुद्धिवादी आणि चिकित्सक व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा प्रभाव लक्ष्मीबाई टिळक यांच्यावर लवकरच पडला. ‘स्मृतिचित्रे’ या आत्मकथनातून लक्ष्मीबाई टिळक यांनी तत्कालीन सामाजिक व्यवस्थेचे चित्रण केले आहे. त्यांचे पती रेव्ह. ना.वा. टिळक व त्या स्वत: ख्रिस्ती कशा झाल्या याचे वर्णन या पुस्तकात त्यांनी केले आहे. त्यांच्या या आत्मचरित्रात, जातीव्यवस्था, धार्मिक विद्वेष, विचारस्वातंत्र्यावर असलेली बंधने, यांचे वर्णन आले आहे. ८ जुलै, १९०० रोजी लक्ष्मीबाईंचा ख्रिस्ती धर्मात प्रवेश झाला. त्याशिवायही त्यांनी वैविध्यपूर्ण लेखन केले. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक वस्तुसंग्रहालय बी.जी. वाघ यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सहायक सचिव डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी करून दिला. श्रीकांत बेणी यांनी आभार मानले.

इन्फो

महाराष्ट्र सरकारतर्फे लक्ष्मीबाई टिळक यांच्या नावाचा पुरस्कार एखाद्या आत्मकथनात्मक पुस्तकाला किंवा आत्मचरित्राला दिला जातो. माणसा-माणसांत भेदभाव करण्याची दुष्ट प्रवृत्ती मनातून समूळ नाहीशी होणं हे खरं धर्मांतर. त्यानंतर, तुम्ही कोणत्या लौकिक धर्माचा स्वीकार करता ते गौण आहे. जाती-धर्माची नव्हे, तर देवाची लेकरं व्हा, हेच स्मृतिचित्रेचे सार असल्याचे पगार यांनी नमूद केले.