शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

राजकारण्यांमुळे ‘स्मार्ट सिटी’ला फटका

By admin | Updated: February 28, 2016 23:49 IST

सुलक्षणा महाजन : अभ्यासपूर्ण सादरीकरण

 नाशिक : ठेकेदारांशी आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्याने अनेक शहरांतील नगरसेवक ‘स्मार्ट सिटी’तील योजनांना विरोध करीत आहेत. या योजनांमुळे आपल्या अधिकारांवर गदा येत असल्याच्या त्यांच्या म्हणण्यात तथ्य नाही. निव्वळ टेंडरवर हक्क सांगणाऱ्या नगरसेवकांनी आपल्या जबाबदाऱ्या निभावल्या असत्या तर ही वेळच आली नसती, अशा शब्दांत नागरीकरण तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी राजकारण्यांना फटकारले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘मुक्तायन’ उपक्रमात ‘स्मार्ट सिटी’ या सध्या गाजत असलेल्या विषयावर महाजन यांचे व्याख्यान व सादरीकरण झाले. त्यांनी ‘स्मार्ट सिटी’ ही संकल्पना, तिची वैशिष्ट्ये, तिच्यापुढची आव्हाने या बाबी अभ्यासपूर्ण रीतीने उलगडून दाखवल्या. त्या म्हणाल्या, परदेशात १९६० पासून शहरांचा अभ्यास सुरू झाला. आपल्याकडे अजूनही तो होत नाही. येत्या २०५० पर्यंत ७५ टक्के जग नागरी होईल; मात्र या शहरीकरणात फक्त भौतिक विकास अपेक्षित नाही, तर नागरिकांची मानसिकताही महत्त्वाची आहे. अमेरिकेत शहरे मैलोन्मैल पसरलेली आहेत, तर दुबईत मात्र फक्त इमारती, विमानांची गर्दी आहे. या सगळ्यात माणूस बेदखल आहे. स्मार्ट सिटी संकल्पनेत स्मार्ट प्रशासन, पाणी, वाहतूक, तंत्रज्ञान, ऊर्जा, इमारती, आरोग्यसेवा, नागरिक यांचा अंतर्भाव असला, तरी त्यात प्रशासन व नागरिक हे सर्वांत महत्त्वाचे घटक आहेत. या पार्श्वभूमीवर आरामदायी शहरे निर्माण करण्याचे आव्हान उभे असल्याचे त्या म्हणाल्या. २००८-०९ मध्ये स्मार्ट फोनद्वारे एकाच उपकरणातून अनेक गोष्टी साध्य करता येऊ लागल्यानंतर हे तंत्रज्ञान शहर नियोजनासाठी वापरता येईल का, याचा विचार सुरू झाला. भारताने शंभर ‘स्मार्ट’ शहरे निर्माण करण्याची घोषणा केल्यानंतर ‘युनो’ने एक संशोधन अहवाल प्रसिद्ध केला. त्यात ‘स्मार्ट सिटी’चे निकष ठरवण्यात आले. मानवी भावभावनांमुळे घडणाऱ्या चुका शहराच्या यंत्रणेवर विपरीत परिणाम करतात. स्मार्ट सिटीमध्ये अशा चुकांवर मात करता येते. अपघात कोणाकडूनही घडलेला असला, तरी त्याची आपोआप नोंद होते. ही यंत्रणा न्यायव्यवस्थेशी संलग्न असते. सांडपाणी ओव्हरफ्लो होणार असेल वा ट्रान्सफॉर्मर बदलण्याची वेळ आली असेल, तरी यंत्रणा सूचना देते. सार्वजनिक आरोग्यात प्रतिबंधासाठी अनेक उपाययोजना करता येतात, असेही त्यांनी सांगितले. महाजन यांनी नागरिकांच्या शंकाचे निरसनही केले. डॉ. श्याम अष्टेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)