शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या तुलनेत अल्पशी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:15 IST

नाशिक- जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी मंगळवारी (दि.११) सोमवारच्या तुलनेत रूग्ण संख्येत अल्पशी वाढ झाली आहे. ...

नाशिक- जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी मंगळवारी (दि.११) सोमवारच्या तुलनेत रूग्ण संख्येत अल्पशी वाढ झाली आहे. सोमवारी (दि.१०) १८३५ नवे बाधित होते, मात्र मंगळवारी २ हजार १८७ नवे बाधित आढळले आहेत. अर्थात, कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या मात्र वाढत आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यातील बाधितांच्या संख्येने कहर केला होता. मात्र एका उच्चांकी संख्येपर्यंत गेलेली बाधितांची संख्या मे महिन्यापासून कमी होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसात बाधितांची संख्या कमी अधिक होत असली तरी एकंदर बाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. ८ मे रोजी २,७९५ बाधित आढळले होते. त्यानंतर रविवारी (दि.९) ३ हजार २ रूग्ण तर सोमवारी (दि.१०) १ हजार ८३५ इतकी कमी संख्या होती. शहरातील संख्या ९७३ इतकी कमी होती. गेल्या काही दिवसात चार आकडी संख्येपेक्षा नाशिक शहरातील बाधितांची संख्या कमी होत नव्हती. मात्र सोमवारी हजाराच्या खाली ही संख्या गेल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र मंगळवारी जिल्ह्याच्या आणि शहराच्या बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. मंगळवारी २ हजार १८७ नवे बाधित आढळले आहेत. त्यात नाशिक शहरातील १ हजार ५८४ बाधितांचा समावेश आहे.

बाधितांची संख्या गेल्या चार दिवसात कमी जास्त होत असताना कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. मंगळवारी तब्बल पाच हजाराहून अधिक बाधितांनी कोराेनावर मात केली. शनिवारी (दि.८) ४ हजार ६९, रविवारी (दि. ९) ३ हजार २५

बाधितांची संख्या गेल्या चार दिवसात कमी जास्त होत असताना कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. मंगळवारी तब्बल पाच हजाराहून अधिक बाधितांनी कोराेनावर मात केली. शनिवारी (दि.८) ४ हजार ६९, रविवारी (दि. ९) ३ हजार २५ सोमवारी (दि. १०) २ हजार ८३३ तर मंगळवारी (दि.११) उच्चांकी ५ हजार ३८५ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण देखील सध्या कमी होत असून मंगळवारी ३८ बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची एकूण संख्या ३ हजार ९३ झाली आहे.

इन्फो...

आजपासून जिल्ह्यात कडक निर्बंध

राज्य शासनाने कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन ५ एप्रिल पासूनच कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यात आता १२ ते २३ मे असे एकूण बारा दिवस जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील नागरिक वगळता अन्य नागरिकांना केवळ वैद्यकीय कारणासाठीच बाहेेर पडता येणार आहे. उद्योग तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्या देखील बंद ठेवण्यात येणार आहेत. या कडक निर्बंधामुळे बाधितांची संख्या आणखी वेगाने कमी होण्यास मदत होईल, असे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.