शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:08 IST

सिन्नर तालुक्यातील ठाणगावजवळील टेंभूरवाडी (आशापूर) येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गाय ठार झाली आहे. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. यामुळे शेतकºयांमध्ये दहशत निर्माण झाली असून, वनविभागाने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगावजवळील टेंभूरवाडी (आशापूर) येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गाय ठार झाली आहे. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. यामुळे शेतकºयांमध्ये दहशत निर्माण झाली असून, वनविभागाने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.टेंभूरवाडी येथील आनंदा सावळेराम पाटोळे यांनी त्यांच्या शेतात गुरुवारी (दि. ३१) सकाळी जर्शी गाय, वासरू व अन्य जनावरे चरण्यासाठी बांधलेली होती. सायंकाळी ५ वाजता पाटोळे यांचा मुलगा शांताराम जनावरे घरी आणण्यासाठी गेला असता वंजारदरा भागात बिबट्याने जर्शी गाईला सुमारे दीडशे फूट ओढत नेले. शांताराम यांच्या सदर प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. मात्र तोपर्यंत बिबट्याने गायीचा फडशा पाडला होता. बिबट्याला हुसकावून लावले; पण जर्शी गायला ठार केल्याने बाकीचे जनावरे बिबट्याच्या भीतीने इतरत्र पळत होते. पाटोळे याचे सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून वंजारदरा भागात बिबट्याची दहशत होती; पण कोणतीही घटना घडली नसल्याने शेतकरी बिनधास्त होते. बिबट्याच्या भरदिवसा दर्शन देत असल्याने शेतमजूर या भागात भीतीमुळे जाण्यास तयार होत नाही. वंजारदरा भागात वनविभागाच्या वतीने घटनास्थळी वनरक्षक तानाजी भुजबळ यांनी भेट देऊन पंचनामा केला.