शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळला

By admin | Updated: September 19, 2015 22:06 IST

पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळला

पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीतीदेवळा : देवळा नऊ गाव सामुदायिक पाणीपुरवठा योजनेतील सरस्वतीवाडी येथील पाण्याच्या टाकीचा स्लॅबचा काही भाग पुन्हा कोसळला असून, उर्वरित स्लॅबही कोसण्याच्या अवस्थेत असल्याने पाणीपुरवठा योजना धोक्यात आली आहे.सामुदायिक पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाली असून, यापूर्वीही सरस्वतीवाडी येथील टाकीचा स्लॅब फेब्रुवारी महिन्यात कोसळल्याने योजना बंद पडली होती. परंतु त्यावेळी तात्पुरती डागडुजी करून योजना पुन्हा सुरू करण्यात आली होती. पंधरा दिवसांपासून गिरणा नदीपात्रात असलेल्या विहिरींना पाणी नसल्याने शहरासह नऊ गावांचा पाणीपुरवठा बंद झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. गिरणा नदीपात्रात असलेल्या उद्भव विहिरींजवळच शहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेसाठी खोदलेली नवीन विहीर आहे. या विहिरीतील पाणी उद्भव विहिरीत टाकून नऊ गाव पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची मागणी नितीन शेवाळकर यांनी नगरपंचायतीचे प्रशासक तथा तहसीलदार शर्मिला भोसले यांच्याकडे केली होती. त्या प्रमाणे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय साधून स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीतील पाणी उद्भव विहिरीत टाकले गेले. शुक्रवारी सकाळी देवळा शहरात अर्धातास पाणीपुरवठा झाला. दरम्यान, पाऊस सुरू झाल्याने सरस्वतीवाडी येथील पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळला असून, उर्वरित स्लॅबचा भागही पावसात भिजल्याने कोसळण्याच्या स्थितीत आहे. स्लॅब कोसळून योजना बंद पडली तर पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल. देवळा शहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)