शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

सर, तुम्ही मला भाकरीचं अर्थशास्त्र शिकवलंच नाही..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:11 IST

: येवल्यात मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजन येवला : सर, मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी, तुम्ही मला मागणी पुरवठ्याचं अर्थशास्त्र शिकवलं; पण ...

: येवल्यात मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजन

येवला : सर, मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी, तुम्ही मला मागणी पुरवठ्याचं अर्थशास्त्र शिकवलं; पण भाकरीचं अर्थशास्त्र शिकवलंच नाही ...

अशा सामाजिक आशयाची कविता विद्राेही कवी शिवाजी भालेराव यांनी येथील मराठी साहित्य परिषदेच्यावतीने आयोजित माझी कविता - काव्यमाला या ऑनलाइन काव्यमालेत म्हटली.

भालेराव यांनी दिंडी निघणार आहे, या काव्यसंग्रहातील कळप, हत्येचा इतिहास, कुपोषित बालकांनो, दिंडी निघणार आहे, सर तुम्ही मला हे शिकवलंच नाही या सामाजिक आशयांच्या पाच कवितांचे काव्य वाचन करत कवितेच्या मुलार्थावर भाष्य केले.

वास्तव जीवन आणि शिक्षण यातील भेदावर भाष्य करताना कवी भालेराव म्हणतात

सर, हत्येचा इतिहास या कवितेची मांडणी करताना

दाभोळकर, पानसरे, कलबुर्गींची हत्या झाली, याचे मला नवल वाटले नाही; कारण,

प्रचलित व्यवस्थेच्या मुळावर घाव घालणाऱ्या सुधारकांच्या हत्या इतिहासाला नव्या नाहीत... म्हणत

कपिल चार्वाक, कबीर, चक्रधर, ज्ञानेश्वर, तुकाराम, चोखा, जॉन विक्लिफ, जॉन हस, झ्विगंली, कोपर्निक्स, गॅलिलिओपासून तर फुले, आंबेडकरांपर्यंत दाखले देत समाज परिवर्तनाची मांडणी करणाऱ्या या सुधारकांचा छळ तर अनेकांच्या हत्या या तत्कालीन व्यवस्थेने केल्या आहेत. या वास्तव कवितेने रसिकांना इतिहासाचे अवलोकन करायला भाग पाडले. प्रास्ताविक कार्याध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी केले तर कवीचा परिचय परिषदेचे खजीनदार प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी करून दिला. कार्यक्रमाचा समारोप कवी लक्ष्मण बारहाते यांनी केला.

कवितेचा कवीला अपेक्षित असणारा अर्थ कवितेची पार्श्वभूमी वेगळी असते तर वाचकाला समजलेली कविता यात बऱ्याचदा अंतर पडते. कवीने जगलेली कविता वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मराठी साहित्य परिषदेने दर शनिवारी सायं. ७ वाजता झूम ॲपवर ऑनलाइन काव्यमाला आयोजित केली आहे.

------------------

दिंडी निघणार आहे या विद्रोही कवितेवर भाष्य करताना भालेराव म्हणतात, भक्ती, मुक्ती, श्रद्धेच्या पोटी दैव, प्रारब्धावर विश्वास ठेवत आपलं दु:ख, दैन्य, दारिद्र्य संपवण्यासाठी कष्टकऱ्यांच्या दरवर्षी निघणाऱ्या दिंड्या या पंढरपूर ऐवजी सत्ताधाऱ्यांच्या छावणीवर हल्लाबोल नामाचा गजर करत निघाल्या पाहिजे, अशी विद्रोही मांडणी भालेराव यांनी केली.