शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सर, तुम्ही मला भाकरीचं अर्थशास्त्र शिकवलंच नाही..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:11 IST

: येवल्यात मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजन येवला : सर, मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी, तुम्ही मला मागणी पुरवठ्याचं अर्थशास्त्र शिकवलं; पण ...

: येवल्यात मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजन

येवला : सर, मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी, तुम्ही मला मागणी पुरवठ्याचं अर्थशास्त्र शिकवलं; पण भाकरीचं अर्थशास्त्र शिकवलंच नाही ...

अशा सामाजिक आशयाची कविता विद्राेही कवी शिवाजी भालेराव यांनी येथील मराठी साहित्य परिषदेच्यावतीने आयोजित माझी कविता - काव्यमाला या ऑनलाइन काव्यमालेत म्हटली.

भालेराव यांनी दिंडी निघणार आहे, या काव्यसंग्रहातील कळप, हत्येचा इतिहास, कुपोषित बालकांनो, दिंडी निघणार आहे, सर तुम्ही मला हे शिकवलंच नाही या सामाजिक आशयांच्या पाच कवितांचे काव्य वाचन करत कवितेच्या मुलार्थावर भाष्य केले.

वास्तव जीवन आणि शिक्षण यातील भेदावर भाष्य करताना कवी भालेराव म्हणतात

सर, हत्येचा इतिहास या कवितेची मांडणी करताना

दाभोळकर, पानसरे, कलबुर्गींची हत्या झाली, याचे मला नवल वाटले नाही; कारण,

प्रचलित व्यवस्थेच्या मुळावर घाव घालणाऱ्या सुधारकांच्या हत्या इतिहासाला नव्या नाहीत... म्हणत

कपिल चार्वाक, कबीर, चक्रधर, ज्ञानेश्वर, तुकाराम, चोखा, जॉन विक्लिफ, जॉन हस, झ्विगंली, कोपर्निक्स, गॅलिलिओपासून तर फुले, आंबेडकरांपर्यंत दाखले देत समाज परिवर्तनाची मांडणी करणाऱ्या या सुधारकांचा छळ तर अनेकांच्या हत्या या तत्कालीन व्यवस्थेने केल्या आहेत. या वास्तव कवितेने रसिकांना इतिहासाचे अवलोकन करायला भाग पाडले. प्रास्ताविक कार्याध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी केले तर कवीचा परिचय परिषदेचे खजीनदार प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी करून दिला. कार्यक्रमाचा समारोप कवी लक्ष्मण बारहाते यांनी केला.

कवितेचा कवीला अपेक्षित असणारा अर्थ कवितेची पार्श्वभूमी वेगळी असते तर वाचकाला समजलेली कविता यात बऱ्याचदा अंतर पडते. कवीने जगलेली कविता वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मराठी साहित्य परिषदेने दर शनिवारी सायं. ७ वाजता झूम ॲपवर ऑनलाइन काव्यमाला आयोजित केली आहे.

------------------

दिंडी निघणार आहे या विद्रोही कवितेवर भाष्य करताना भालेराव म्हणतात, भक्ती, मुक्ती, श्रद्धेच्या पोटी दैव, प्रारब्धावर विश्वास ठेवत आपलं दु:ख, दैन्य, दारिद्र्य संपवण्यासाठी कष्टकऱ्यांच्या दरवर्षी निघणाऱ्या दिंड्या या पंढरपूर ऐवजी सत्ताधाऱ्यांच्या छावणीवर हल्लाबोल नामाचा गजर करत निघाल्या पाहिजे, अशी विद्रोही मांडणी भालेराव यांनी केली.