सिन्नर : शहर व तालुक्यातील विविध विद्यालयांच्या वतीने वृक्षांबद्दलची असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वृक्षांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वाजे विद्यालय : येथील लोकनेते शं. बा. वाजे विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना योजनांतर्गत इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम पर्यावरण पूर्वक पद्धतीने केला. या विद्यार्थ्यांनी झाडाच्या पाना- फुलांपासून बनविलेल्या राख्या विद्यालयाच्या परिसरातील वृक्षांना बांधण्यात आल्या. यावेळी मुख्याध्यापक एस. एस. खैरनार यांनी वृक्ष हे आपल्या मूलभूत गरजा भागवतात. त्यातून ते आपले रक्षण करतात. ते आपले मोठे बांधव समजून त्यांच्या प्रति असलेली कृतज्ञतेची भावना असायला हवी. त्यांचे संवर्धन करावे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी मविप्रचे संचालक कृष्णा भगत, सुमंत गुजराथी, हेमंत वाजे, उपमुख्यध्यापक आर. पी. म्हस्के, पर्यवेक्षक बी. आर. कहांडळ, जी. एस. खैरनार, मनोहर कासार, आर. बी. रणशेवरे, श्रीमती एम. ए. बनकर, श्रीमती ए. पी. शिंदे, श्रीमती एम. व्ही. पाटील आदिंसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. अभिनव बालविकास : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या अभिनव बालविकास मंदिर या शाळेच्या वतीने देवळाली कॅम्प येथील आर्टलरी सेंटर येथे जाऊन सैनिकांना राख्या बांधण्यात आल्या. सीमेवरील जवानांसाठी चिमुकल्या विद्यार्थिनींच्या वतीने एक हजार राख्या सुपुर्द करण्यात आल्या. विद्यार्थिनी स्नेहल जाधव यांनी रक्षाबंधनाची माहिती सांगितली. यावेळी लेप्टनंट कर्नल सुरी, मेजर अभय सिंग, मुख्याध्यापक श्रीमती एस. आर. आव्हाड उपस्थित होते. यावेळी आर. के. बुचकूल, एस. टी. जगताप, एस. बी. कुमावत, एन. सी. दातीर, एम. के. चारोस्कर उपस्थित होते. भिकुसा हायस्कूल : विद्यालयात क्रांतिदिन व रक्षाबंधन एकत्रित पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्रा. शेखर बर्वे, हिंदवी स्वराज्य संघाचे विष्णू गोजरे व्यासपीठावर उपस्थित होते. सुमंत गुजराथी यांनी ‘सैनिकांसाठी राखी’ या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी ५२६ राख्या सैनिकांसाठी पाठविण्यात आल्या. यावेळी झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत २२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन क्रांतिकारकांना अभिवादन केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून पी. के. देवरे, जे. टी. सावंत यांनी काम पाहिले. गुळवंच : येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या वतीने सैनिकांप्रती भातृभाव जोपसण्यासाठी सीमेवरील सैनिकांसाठी राख्या पाठविण्यात आल्या. यावेळी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या उपक्रमात पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती शीतल कोठावदे, मुख्याध्यापक संदीप सानप, रामदास घुगे, राजेश सांगळे, श्रीधर गीत, मनीषा उगले आदि उपस्थित होते. पांढुर्ली : येथील जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देवळाली कॅम्प येथे जाऊन लष्करी सेवेतील जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले. यावेळी कॅप्टन प्रशांत त्रिपाठी, मेजर सुभेदार जसवंतसिंग, मुख्याध्यापक एस. ए. पाटील आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
सिन्नरला विद्यार्थिनींनी दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश
By admin | Updated: August 13, 2014 00:41 IST