शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

सिन्नरमधील धरणे ‘ओव्हरफ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 01:43 IST

सिन्नर : यावर्षी उशिरा आगमन झालेल्या वरुणराजाने सिन्नर तालुक्याच्या पश्चिम डोंगराळ भागात गेल्या आठवड्याभरापासून मुक्काम ठोकल्याने तालुक्यातील महत्त्वाची धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : यावर्षी उशिरा आगमन झालेल्या वरुणराजाने सिन्नर तालुक्याच्या पश्चिम डोंगराळ  भागात गेल्या आठवड्याभरापासून मुक्काम ठोकल्याने तालुक्यातील महत्त्वाची धरणे ओव्हरफ्लो  झाली आहेत. तालुक्यातील सर्वात मोठे भोजापूर धरण ९५ टक्के भरले आहे. शहरालगत असणारे सरदवाडी धरण, पश्चिम पट्ट्यातील कोनांबे, ठाणगावजवळील उंबरदरी धरण ओसंडून वाहत असल्याने तालुक्यात समाधानकारक वातावरण आहे. गेल्या आठवड्यापासून सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे सर्वप्रथम बोरखिंड धरण ओव्हरफ्लो झाले. त्यापाठोपाठ कोनांबे, उंबरदरी धरण भरले आहे. त्यामुळे म्हाळुंगी व देव नदीला पूर आल्याचे चित्र आहे. रविवारी रात्री सिन्नरजवळील सरदवाडी धरण  भरले. म्हाळुंगीला पूर आल्याने तालुक्यातील सर्वात मोठे भोजापूर धरण भरण्याच्या मार्गावर आहे. भोजापूर धरण सुमारे ९५ टक्के भरले असून, सोमवारी रात्री ते ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस होत असताना पूर्वभागात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. पूर्वभागातील नद्यांना व ओढ्यांना अद्याप पाणी नसले तरी पश्चिम भागातून येणाऱ्या पूरपाण्यामुळे देव नदी प्रवाहित झाली आहे. सरदवाडी ‘ओव्हरफ्लो’सरदवाडी : पश्चिम पट्ट्यात सुरू असलेल्या पावसामुळे शिव नदी प्रवाहित झाल्याने शहराजवळील सरदवाडी धरण रविवारी रात्री भरले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून संततधार असल्याने सरदवाडी धरणही भरले आहे. उन्हाळ्यात कोरडेठाक झालेल्या सरदवाडी धरणात गेल्या आठ दिवसांपासून पाण्याची आवक सुरू झाली होती. त्यातच गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपीनंतर शनिवारपासून पावसाने जोर पकडला होता. जामगाव, पास्ते, खापराळेसह शिव नदीच्या उगम क्षेत्रात कोसळलेल्या धो धो पावसामुळे शिव नदी प्रवाहित होऊन धरण भरले. शिव नदीसह सरदवाडी धरणात येणाऱ्या चिखली, राणीखाण, बैलाचे रान या प्रमुख नाल्यांसह सर्व लहान-मोठे ओढेही वाहत असल्याचे चित्र होते. देव नदीवर कुंदेवाडी, मुसळगाव, खोपडी, देवपूर, कीर्तांगळी येथील बंधारे भरत देवनदी सोमवारी पहाटे वडांगळी येथे पोहचली. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला आहे.गेल्या अनेक वर्षात दुशिंगपूर व फुलेनगर या बंधाऱ्यात पाणी आलेले नाही. यावर्षी लवकरच भोजापूर धरण ओव्हरफ्लो होत असून, पावसाळ्यात कालव्यांद्वारे या बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडल्यास पूर्वभागातील पाणीटंचाई कमी होईल. पूर कालव्यांद्वारे भोजापूरचे पाणी या दोन बंधाऱ्यात सोडण्याची मागणी वावीचे माजी सरपंच रामनाथ कर्पे, फुलेनगरचे माजी सरपंच संपत पठाडे, खंडेराव अत्रे, सोमनाथ थोरात, दुशिंगपूरचे कचरू घोटेकर, सुकदेव ढमाले, रामनाथ ढमाले, चंद्रभान गोराणे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.