मालेगाव : तालुक्यातील सौंदाणे येथील जनता विद्यालयात आर्यसमाज मालेगावतर्फे श्रावणमासानिमित्त आयोजित तीन दिवसीय कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. अध्यक्षस्थानी आर्यसमाज प्रदेश कार्यकारिणी सदस्य हरिप्रसाद गुप्ता होते. प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली येथील वेदविद्याभ्यासक बृजेश शास्त्री होते. वेदांचा मूळ अर्थ माणसाला माणूस म्हणून घडविणे असा आहे. मात्र वेदांपासून दूर गेल्यामुळेच मानवाचे नैतिक अध:पतन झाले असल्याचे शास्त्री यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले. सूत्रसंचालन शहरमंत्री दीपक गुप्ता यांनी केले. यावेळी प्रधान मज्जू, सुरेश पाटील, पूजा पंचारिया यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आदि उपस्थित होते.
सौंदाणेत श्रावणपर्व समारोपाचा कार्यक्रम
By admin | Updated: August 14, 2014 01:41 IST