शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

विमा कवचप्रकरणी बाजार समितीला झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:18 IST

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने ग्रामपंचायत व सोसायटी सदस्यांना विमा कवच देण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती ...

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने ग्रामपंचायत व सोसायटी सदस्यांना विमा कवच देण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली आहे. माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत हा निर्णय घेण्यात आला असून, नाशिक बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आलेला असताना अशाप्रकारचा निर्णय घेण्याचा मंडळाला अधिकारच नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

गेल्यावर्षी दि. १९ ऑगस्ट २०२० रोजी बाजार समितीची मुदत संपुष्टात आली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहकार व पणन विभागाने संचालक मंडळाला दोनवेळा मुदतवाढ दिली होती. माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी यासाठी उच्च न्यायालयात धाव घेत राज्य शासन, पणन संचालक, जिल्हा उपनिबंधक व बाजार समितीविरोधात याचिका दाखल केली होती. बाजार समिती बरखास्त करावी आणि बाजार समितीला पुन्हा मुदतवाढ मिळू नये, हे याचिकेतील मुख्य मुद्दे होते. या याचिकेवर बुधवार (ता. १५) रोजी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यात चुंभळे यांच्या वकिलांनी युक्तिवाद करत बाजार समितीची मुदतवाढ संपली असून, त्यांना धोरणात्मक निर्णय घेता येत नाही, अशी बाजू मांडत बाजार समितीने नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत ग्रामपंचायत, सोसायटी सदस्य यांना विमा कवच देण्याचा निर्णय रद्द।करण्याची मागणी केली. नियमानुसार संचालक मंडळाला असा निर्णय घेता येत नाही, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे पुढील सुनावणी होईपर्यंत बाजार समितीच्या विमा कवच योजनेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यावेळी चुंभळे यांच्यावतीने ॲड. थोरात यांनी काम पाहिले, तर बाजार समितीच्यावतीने ॲड. जा. के. फालकर, किशोर पाटील, प्रमोद जोशी व प्रतीक रहाडे यांनी काम पाहिले.

चौकट===

‘बाजार समितीला दुसऱ्यांदा झटका’

यापूर्वीही नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने ‘नासाका’ सुरू करण्याच्या प्रक्रियेत पाऊल उचलले होते. तसेच ई-निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी समिती प्रयत्नशील होती. मात्र, माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी मुख्यमंत्री, सहकार मंत्री, साखर आयुक्त, पणन मंडळ, जिल्हा उपनिबंधक यांना पत्र देत याला विरोध दर्शविला होता. त्यांच्या प्रयत्नांना तेव्हा यश आले. तसेच यावेळीदेखील बाजार समितीने घेतलेल्या विविध सोसायट्या, संचालक व ग्रामपंचायत सदस्य यांना विमा कवच देण्याच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. चुंभळे यांच्यामुळे बाजार समितीच्या निर्णयांना दुसऱ्यांदा खोडा बसला आहे.