शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

शिवसेना सध्या मागणाऱ्याच्या भूमिकेत

By admin | Updated: May 18, 2017 00:38 IST

सुभाष देसाई : शेतकरी लढ्याची शुक्रवारी घोषणा

 नाशिक : नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे शेतकरी कर्जमुक्त व्हावा हीच शिवसेनेची मागणी असून, सत्तेत असलो तरी शिवसेना सध्या मागणाऱ्याच्या भूमिकेत असल्याने शेतकऱ्यांना देणाऱ्याच्या भूमिकेत फक्त मुख्यमंत्री व वित्तमंत्री असल्याची टीका शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतकरी कर्जमुक्तीच्या लढ्याची घोषणा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. शुक्रवारी नाशिक येथे शेतकरी कृषी अधिवेशन होत असून, त्यापार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी  सुभाष देसाई व खासदार संजय राऊत यांचे येथे आगमन झाले. या अधिवेशनाची त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, शिवसेना सध्या राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेत असून, मराठवाडा, विदर्भ, अकोला यांसारख्या भागांमध्ये केलेल्या पाहणीत व घेतलेल्या भेटीत शेतकऱ्यांच्या अनेक समस्या समोर आल्या आहेत. दोन ते तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत, तर शासनाच्या योजनादेखील त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नसल्याचे आढळून आले आहे. तूर खरेदीबाबतही शासन अपयशी ठरले असून, शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांच्या तुरीला अधिक महत्त्व दिले जात आहे. शेतकऱ्यांवर होत असलेल्या चौहोबाजूंनी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिवसेनेने दक्षता पथक नेमण्याचा निर्णय घेतला असून, जेथे शेतकऱ्यांवर अन्याय होईल तेथे सरकारला जाब विचारण्यात येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. ‘मी कर्जमुक्त होणारच, गर्जतो शेतकरी’ असा नारा घेऊन शिवसेना रस्त्यावर उतरली असून, शुक्रवारच्या अधिवेशनात या लढ्याची मोठी घोषणा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. शिवसेना सत्तेत असूनही सरकारविरुद्ध आंदोलनाच्या भूमिकेत असल्याचे देसाई व खासदार राऊत यांनी समर्थन केले. सत्तेत असलो तरी आमच्याकडे शेतकऱ्यांना देण्यासारखे काहीच नाही म्हणून ते मिळविण्यासाठीच शिवसेना लढ्यात उतरल्याचे सांगून शेतकरी कर्जमुक्ती झाली नाही तर पावसाळी अधिवेशनावर शेतकऱ्यांचा भव्य लॉँगमार्च काढण्यात येईल व ‘आर-पार’ची लढाई लढण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, यास सरकार व रिझर्व्ह बॅँक जबाबदार असल्याची टीका केली, तसेच समृद्धी महामार्ग हे मुख्यमंत्र्यांचा स्वप्नवत प्रकल्प असून, त्यासाठी शेतकरी उद्ध्वस्त झाला तरी चालेल अशी त्यांची भूमिका आहे पण शिवसेना ते होऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांकडून संप फोडण्याचे राजकारणराज्यातील शेतकऱ्यांनी एक जूनपासून संपावर जाण्याची घोषणा केली आहे, ते पाहता मुख्यमंत्र्यांनी धुळे येथे जाण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष द्यायला हवे होते, असा टोला लावून देसाई यांनी, देशात पहिल्यांदाच शेतकरी संपावर जाण्याची घटना घडत असताना मुख्यमंत्री संप फोडण्याचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला. कृषी अधिवेशनात संपावर जाणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधीदेखील सहभागी होणार असल्याची माहितीही देसाई यांनी दिली.