शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना - भाजपाकडून ५१ नगरसेवक रिंगणात

By admin | Updated: February 5, 2017 22:54 IST

२९ आयारामांना संधी : पक्षाच्या २२ नगरसेवकांना उमेदवारी

नाशिक : महापालिका निवडणुकीत सेना-भाजपाकडून तब्बल ५१ विद्यमान नगरसेवक पुन्हा आपले नशीब आजमावणार आहेत. शिवसेनेने आपल्या १६, तर भाजपाने ६ नगरसेवकांना उमेदवारी दिली आहे, तर अन्य पक्षांतून सेनेत दाखल झालेल्या १५, तर भाजपात दाखल झालेल्या १४ आयाराम नगरसेवकांना उमेदवारी करण्याची संधी देण्यात आली आहे. सेना-भाजपाकडून प्रत्यक्ष किती नगरसेवकांच्या गळ्यात पुन्हा विजयमाला पडेल, याबाबत आता उत्सुकता ताणून राहील. महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपा हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार आहेत. त्यानुसार दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार घोषित केले आहेत. त्यात शिवसेना वा भाजपाने बव्हंशी नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी बहाल केलेली आहे. त्यात भाजपाने विद्यमान नगरसेवक रंजना भानसी, दिनकर पाटील, प्रा. कुणाल वाघ, सुनंदा मोरे, संभाजी मोरुस्कर, सतीश कुलकर्णी यांना उमेदवारी दिली आहे, तर फुलाबाई बोडके यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र कमलेश बोडके यांना, तर शालिनी पवार यांच्याऐवजी त्यांचे पती अरुण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सविता दलवाणी, सिंधू खोडे, परशराम वाघेरे व ज्योती गांगुर्डे यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे खोडे वगळता अन्य तिघांनी अन्य पक्षांची उमेदवारी मिळविली आहे. भाजपाने मात्र अन्य पक्षातून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश करणाऱ्या उद्धव निमसे, रुची कुंभारकर, दामोदर मानकर, रेखा बेंडकुळे, शशिकांत जाधव, शिवाजी गांगुर्डे, माधुरी जाधव, अर्चना थोरात, कन्हैया साळवे, संगीता गायकवाड, कोमल मेहरोलिया, दीपाली कुलकर्णी, सतीश सोनवणे व सुदाम कोंबडे या आयारामांना उमेदवारी बहाल केली आहे. शिवसेनेने मनीषा हेकरे, अजय बोरस्ते, विलास शिंदे, सचिन मराठे, शैलेश ढगे, सूर्यकांत लवटे, नयना घोलप, केशव पोरजे, सुनीता कोठुळे, कल्पना पांडे, सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, उत्तम दोंदे, शोभा फडोळ, डी. जी. सूर्यवंशी आणि वंदना बिरारी यांना पुन्हा संधी दिली आहे. विनायक पांडे यांनी घरातच चार तिकिटे मागितल्याने राडेबाजी होऊन त्याची दखल पक्षाने घेतली. त्यामुळे विनायक पांडे लढतीत नसतील. कोमल मेहरोलिया यांनी भाजपात प्रवेश केला आहे, तर शिवाजी सहाणे यांनी पुन्हा निवडणूक न लढविण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. शिवसेनेने यतिन वाघ, योगीता अहेर, नंदिनी जाधव, विजय ओहोळ, मंगला आढाव, रंजना बोराडे, अशोक सातभाई, रमेश धोंगडे, कल्पना चुंभळे, शीतल भामरे, सुवर्णा मटाले, रत्नमाला राणे, अरविंद शेळके, शेख रशीदा, संजय चव्हाण या पक्षबदलूंना उमेदवारी बहाल केली आहे. तब्बल ४१ टक्के नगरसेवक हे सेना-भाजपाकडून पुन्हा नशीब आजमावत आहे. त्यातील किती जणांच्या गळ्यात पुन्हा विजयमाला पडते, हे २३ फेबु्रवारीला समोर येईलच. (प्रतिनिधी)भाजपाने एकूण २०, तर शिवसेनेने एकूण ३१ नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे. याशिवाय काही माजी नगरसेवकांनाही उमेदवारी बहाल करण्यात आलेली आहे. त्यामुळे  सेना-भाजपाला स्वबळावर अनेक नवीन चेहऱ्यांना निवडून आणण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. बहुमतासाठी आवश्यक ६२ आकडा स्वबळावर पार करण्यासाठी सेना-भाजपाला मोठी कसरत करावी लागणार आहे.