शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार : चालते-फिरते विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:40 IST

माझा शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, आदिवासींचे जीवनमान उंचावले पाहिजे, नोकरदार, व्यावसायिकांचे प्रश्न सुटले पाहिजे, अशी भावना ठेवत दीन-दलित, गोरगरीब ...

माझा शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, आदिवासींचे जीवनमान उंचावले पाहिजे, नोकरदार, व्यावसायिकांचे प्रश्न सुटले पाहिजे, अशी भावना ठेवत दीन-दलित, गोरगरीब समाजातील प्रत्येक घटकाच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहत आले आहेत. आदिवासींच्या कल्याणासाठी स्वतंत्र बजेटची तरतूद त्यांनी केली. जेव्हा कधी त्यांची भेट होते तेव्हा शेती प्रश्नावर हमखास चर्चा होते अन‌् प्रश्न निश्चित सुटले जातात. राज्यात कोणतीही नैसर्गिक आपत्ती येवो, साहेब सर्वप्रथम शेतकऱ्यांना धीर देतात, मदत मिळवून देतात. कांदा प्रश्नासाठी साहेब मनमाडहून तातडीने दिल्लीला जाऊन प्रश्न सोडविल्याचे अनेक प्रसंग आहेत. साहेब नेहमी शेतकऱ्यांसाठी धावून येत असल्याचे मी वारंवार बघितले आहे.

माजी खासदार हरिभाऊ महाले यांचे निधन झाल्यावर साहेब अंत्यविधीला आले तेव्हा ते कृषिमंत्री होते. रस्त्याने जाताना खेडले परिसरात त्यांनी शेतकऱ्यांनी जमीन लेव्हल केलेली बघितली. रस्त्याच्या कडेला मोठमोठे दगड बघितले. गाडी थांबवायला सांगून त्यांनी पाहणी केली. डोंगर, टेकड्या, पडीक जमीन काही शेतकरी स्वखर्चाने सपाट करत आहेत; पण गरीब शेतकरी करू शकत नाही हे त्यांना कळले अन‌् त्यांनी तातडीने राष्ट्रीय बागवणी बोर्ड (एनएचबी) च्या अधिकाऱ्यांशी बोलून या भागात बोर्डच्या योजना राबविण्याच्या सूचना केल्या. नाशिकमध्ये सदर विभागाचे कार्यालय सुरू झाले अन‌् हजारो शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेत माळरान सपाट करत बागा फुलवल्या. वेगवेगळ्या योजनांचा फायदा घेत पॅक हाऊस, कोल्ड स्टोरेज उभे केले, नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक लाभ मिळाला.

ऊस उत्पादक व कारखान्यांचे पवार साहेब नेहमीच तारणहार राहिले. उसाला जास्त पाणी लागते म्हणून ऊस शेती कमी व्हावी यासाठी अनेकांचे प्रयत्न झाले; मात्र शरद पवार हे सदैव ऊस उत्पादकांच्या पाठीशी राहिले. हमीभाव व नगदी पीक म्हणून ऊस क्षेत्र वाढले पाहिजे व उसामुळे कारखाने व त्यावर अनेकांचे रोजगार अवलंबून असल्याने ते नेहमीच हा उद्योग टिकला पाहिजे यासाठी प्रयत्नशील आहेत. आजही साखरेला उठाव नसल्याने साखर कारखाने अडचणीत आहेत. या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ते सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहेत.

पवार साहेबांना नाशिक जिल्ह्याने नेहमीच खंबीर साथ दिली असून, काँग्रेसमध्ये पुलोद आघाडी व आता राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच जिल्ह्यात चांगले यश मिळाले. मला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून संधी दिली. जिल्ह्यात मजबूत संघटन झाले. यश मिळाले. साहेबांनी अनेक वेळा कौतुकाची थाप दिली.

मी पवार साहेबांसोबत राहत नेहमी त्यांना साथ दिली. माझ्या कामाची पावती म्हणून त्यांनी मला पक्षाचे जिल्हाध्यक्ष केले व आता साखर संघावर उपाध्यक्ष म्हणून संधी दिली. मी जिल्हा परिषदेत असताना मला जि.प. अध्यक्ष करावे असा निरोप त्यांनी दिला. जि.प.त चर्चा झाली; पण मी दिंडोरी पंचायत समितीचा सभापती असल्याने मला ती संधी मिळाली नाही, तर विधान परिषदवर आमदार होण्याची चर्चा अनेक वेळा झाली; पण ती संधी मिळाली नाही. त्याची आपणास अजिबात खंत नाही. एकदा दिंडोरी दौऱ्यावर केंद्रीय कृषी सचिवांना हा माझा सच्चा कार्यकर्ता स्वतःसाठी कधी काही मागत नाही ही करून दिलेली ओळख माझ्यासाठी सर्वस्व आहे. साहेब सर्व समाजासाठी अहोरात्र झटत असून, पवार साहेबांचे ८० व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन!

- श्रीराम शेटे, माजी जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस