शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

शरद पवार : चालते-फिरते विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:40 IST

माझा शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, आदिवासींचे जीवनमान उंचावले पाहिजे, नोकरदार, व्यावसायिकांचे प्रश्न सुटले पाहिजे, अशी भावना ठेवत दीन-दलित, गोरगरीब ...

माझा शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, आदिवासींचे जीवनमान उंचावले पाहिजे, नोकरदार, व्यावसायिकांचे प्रश्न सुटले पाहिजे, अशी भावना ठेवत दीन-दलित, गोरगरीब समाजातील प्रत्येक घटकाच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहत आले आहेत. आदिवासींच्या कल्याणासाठी स्वतंत्र बजेटची तरतूद त्यांनी केली. जेव्हा कधी त्यांची भेट होते तेव्हा शेती प्रश्नावर हमखास चर्चा होते अन‌् प्रश्न निश्चित सुटले जातात. राज्यात कोणतीही नैसर्गिक आपत्ती येवो, साहेब सर्वप्रथम शेतकऱ्यांना धीर देतात, मदत मिळवून देतात. कांदा प्रश्नासाठी साहेब मनमाडहून तातडीने दिल्लीला जाऊन प्रश्न सोडविल्याचे अनेक प्रसंग आहेत. साहेब नेहमी शेतकऱ्यांसाठी धावून येत असल्याचे मी वारंवार बघितले आहे.

माजी खासदार हरिभाऊ महाले यांचे निधन झाल्यावर साहेब अंत्यविधीला आले तेव्हा ते कृषिमंत्री होते. रस्त्याने जाताना खेडले परिसरात त्यांनी शेतकऱ्यांनी जमीन लेव्हल केलेली बघितली. रस्त्याच्या कडेला मोठमोठे दगड बघितले. गाडी थांबवायला सांगून त्यांनी पाहणी केली. डोंगर, टेकड्या, पडीक जमीन काही शेतकरी स्वखर्चाने सपाट करत आहेत; पण गरीब शेतकरी करू शकत नाही हे त्यांना कळले अन‌् त्यांनी तातडीने राष्ट्रीय बागवणी बोर्ड (एनएचबी) च्या अधिकाऱ्यांशी बोलून या भागात बोर्डच्या योजना राबविण्याच्या सूचना केल्या. नाशिकमध्ये सदर विभागाचे कार्यालय सुरू झाले अन‌् हजारो शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेत माळरान सपाट करत बागा फुलवल्या. वेगवेगळ्या योजनांचा फायदा घेत पॅक हाऊस, कोल्ड स्टोरेज उभे केले, नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक लाभ मिळाला.

ऊस उत्पादक व कारखान्यांचे पवार साहेब नेहमीच तारणहार राहिले. उसाला जास्त पाणी लागते म्हणून ऊस शेती कमी व्हावी यासाठी अनेकांचे प्रयत्न झाले; मात्र शरद पवार हे सदैव ऊस उत्पादकांच्या पाठीशी राहिले. हमीभाव व नगदी पीक म्हणून ऊस क्षेत्र वाढले पाहिजे व उसामुळे कारखाने व त्यावर अनेकांचे रोजगार अवलंबून असल्याने ते नेहमीच हा उद्योग टिकला पाहिजे यासाठी प्रयत्नशील आहेत. आजही साखरेला उठाव नसल्याने साखर कारखाने अडचणीत आहेत. या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ते सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहेत.

पवार साहेबांना नाशिक जिल्ह्याने नेहमीच खंबीर साथ दिली असून, काँग्रेसमध्ये पुलोद आघाडी व आता राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमीच जिल्ह्यात चांगले यश मिळाले. मला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून संधी दिली. जिल्ह्यात मजबूत संघटन झाले. यश मिळाले. साहेबांनी अनेक वेळा कौतुकाची थाप दिली.

मी पवार साहेबांसोबत राहत नेहमी त्यांना साथ दिली. माझ्या कामाची पावती म्हणून त्यांनी मला पक्षाचे जिल्हाध्यक्ष केले व आता साखर संघावर उपाध्यक्ष म्हणून संधी दिली. मी जिल्हा परिषदेत असताना मला जि.प. अध्यक्ष करावे असा निरोप त्यांनी दिला. जि.प.त चर्चा झाली; पण मी दिंडोरी पंचायत समितीचा सभापती असल्याने मला ती संधी मिळाली नाही, तर विधान परिषदवर आमदार होण्याची चर्चा अनेक वेळा झाली; पण ती संधी मिळाली नाही. त्याची आपणास अजिबात खंत नाही. एकदा दिंडोरी दौऱ्यावर केंद्रीय कृषी सचिवांना हा माझा सच्चा कार्यकर्ता स्वतःसाठी कधी काही मागत नाही ही करून दिलेली ओळख माझ्यासाठी सर्वस्व आहे. साहेब सर्व समाजासाठी अहोरात्र झटत असून, पवार साहेबांचे ८० व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन!

- श्रीराम शेटे, माजी जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस