शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

वाटले सतराशेसाठ कोटी, वसुली फक्त शंभर कोटींची

By admin | Updated: March 26, 2017 00:15 IST

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या वतीने चालू आर्थिक वर्षात सुमारे सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना १७५० कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या वतीने चालू आर्थिक वर्षात सुमारे सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना १७५० कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले असून, मार्चच्या मध्यापर्यंत केवळ १०० कोटींचीच वसुली झाल्याने बॅँकेची आर्थिक स्थिती बिकट होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, जिल्हा बॅँकेने वेळेत पीककर्जाची थकबाकी न भरणाऱ्या सभासदांची नावे वृत्तपत्रात देण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी फोटो लावण्याचा इशारा दिल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त करण्यात येत असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे वाटप केलेल्या कर्जाची वेळेत वसुली न केल्यास अनुत्पादक मालमत्ता (एन.पी.ए.) वाढल्यास रिझर्व्ह बॅँकेने जिल्हा बॅँकेवर सहकार कायदा कलम ११० च्या कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्हा बॅँकेला वसुलीसाठी तगादा लावल्यास शेतकऱ्यांची नाराजी आणि वसुली थांबल्यास रिझर्व्ह बॅँकेची कारवाई असा इकडे आड तिकडे विहीर असल्याचा प्रकार जिल्हा बॅँकेसमोर उभा ठाकला आहे. जिल्हा बॅँकेने चालू आर्थिक वर्षात सुमारे सव्वादोन लाख शेतकरी सभासदांना सुमारे १७५० कोटींचे पीककर्ज वाटप केले आहे. या कर्जाची परतफेड ३० जून २०१७ अखेर होणे अपेक्षित आहे. मात्र आता मार्च सुरू झाला तरी या १७५० कोटींपैकी अवघी १०० कोटींची पीककर्ज वसुली झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. जिल्हा बॅँकेच्या प्रशासनाने नुकतेच एक प्रसिद्धीपत्रक काढून राज्य सरकारने नुकताच अर्थसंकल्प सादर केला असून, त्यात शेतकऱ्यांसाठी कुठलीही कर्जमाफी नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या अपेक्षेवर न राहता नियमित घेतलेल्या पीककर्जाची परतफेड करावी, अन्यथा कर्जदारांवर नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. आता उर्वरित तीन महिन्यांत जिल्हा बॅँकेला १६५० कोटी रुपयांची पीककर्ज वसुली करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. (प्रतिनिधी)