शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

आर्थिक अफरातफरीच्या प्रयत्नात असलेल्या ठेकेदारासह दोषींना बाजूला काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:11 IST

नाशिक : आतापर्यंतची सर्व साहित्य संमेलने १.५ कोटी रुपयांपर्यंतच्या खर्चात झालेली असताना नाशिकच्या संमेलनासाठी ४.५ कोटींचे बजेट लागणार असल्याचे ...

नाशिक : आतापर्यंतची सर्व साहित्य संमेलने १.५ कोटी रुपयांपर्यंतच्या खर्चात झालेली असताना नाशिकच्या संमेलनासाठी ४.५ कोटींचे बजेट लागणार असल्याचे सांगत केवळ अधिकाधिक निधी गोळा करण्याचा हव्यास साहित्य संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी धरला. तसेच गोळा होणारा निधी दोन भिन्न खात्यांत जमा करणे, जीएसटीचा घोळ, पावतीपुस्तकांतील विसंगती, कुटुंबातील सदस्यांना, नातेवाइकांना कामे देणे अशा अनेक बाबींतून ठेकेदार जातेगावकर हे आर्थिक अफरातफरीच्या प्रयत्नात होते, हे दिसून आल्याचा आरोप सावाना आणि लोकहितवादी मंडळाचे सदस्य श्रीकांत बेणी यांनी केला आहे. तसेच नियोजनबद्ध पद्धतीने आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा संशय आल्यानेच साहित्य महामंडळाचे अध्यक्ष ठाले पाटील यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची दखल घेऊन संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्वागत समिती सदस्यांची बैठक बोलावून दोषी असणाऱ्यांना बाजूला काढल्यावरच साहित्य संमेलन आयोजनाचा विचार करावा, अशी मागणीही बेणी यांनी पत्रकार परिषदेत केली.

साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत कोणताही आक्षेप नसून केवळ तिथे सुरू असलेल्या संशयात्मक आर्थिक व्यवहारांतील दोषी सूत्रधाराला बाजूला न काढल्यास त्यातून नाशिकच्या संमेलनाची नाचक्की होणार असल्याचे बेणी यांनी नमूद केले. लोकहितवादी संस्थेला संमेलनासाठी स्वतंत्र खाते हे ९४ वे अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या नावे काढण्यास सांगितले असताना त्यांनी ते ९४ एबीएमएसएस लोकहितवादी मंडळाच्या नावाने नामको आणि विश्वास बँकेत दोन स्वतंत्र खाती काढली. त्यात मंडळाकडे आयकर विभागाचे १२ ए प्रमाणपत्र नसून महामंडळाचे पॅनकार्ड वापरून खाते उघडले असते तर देणगीच्या जमा रकमांवर १८ टक्के जीएसटीचा भुर्दंड पडला नसता. लेखापालांनी ही बाब लेखीपत्राद्वारे निदर्शनास आणूनदेखील त्याकडे जातेगावकर यांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. तसेच संमेलन स्थगितीनंतर विविध समिती प्रमुखांच्या बैठकीत देण्यात आलेल्या पावती पुस्तकांवर लोकहितवादी मंडळाचा पॅन नंबर टाकण्यात आला असून, ती पावतीपुस्तके किती छापली त्याचा कोणताही तपशील दिलेला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संमेलन छोटेच करण्याची महामंडळाची सूचना असतानाही मंडपापासून, स्टॉलपर्यंत सर्वच बाबतीत अनावश्यक मोठे आकडे दाखवून संमेलनाचे बजेट दीड कोटींवरून साडेचार कोटींपर्यंत वाढवत नेत त्यातून नियोजनबद्धपणे आर्थिक अफरातफर केली जात असल्याचा संशय घ्यायला जागा असल्याचा आरोपही बेणी यांनी केला.

इन्फो

केवळ शासन,आमदार निधीत संमेलन शक्य

राज्य शासनाकडून जाहीर झालेला ५० लाखांचा निधी तसेच आमदार निधीतून जमा झालेले ९० लाख या एकूण मिळून १ कोटी ४० लाखांच्या निधीतच संमेलन पार पाडणे शक्य आहे. यापूर्वीची सर्व संमेलने १ कोटी रुपयांच्या आतच पार पडली आहेत. त्यामुळे अन्य निधी गोळा न करतादेखील संमेलन पार पडू शकणार असून, त्यात आर्थिक गैरव्यवहारालाही वाव राहणार नसल्याचेही बेणी यांनी नमूद केले. त्यातूनही काही रक्कम उरलीच तर ती सांगलीच्या संमेलनानंतर ज्याप्रमाणे तेथील वाचनालयांना दिली गेली, त्याप्रमाणे सांस्कृतिक कार्य करणाऱ्या संस्था, वाचनालयांना द्यावी, असेही त्यांनी सांगितले.