शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

शेतकऱ्यांसमोर संकटांची मालिका सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:15 IST

जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख २३ हजार ४४५ हेक्टर इतक्या क्षेत्रावर मक्याची पेरणी करण्यात आली आहे. खरिपातील नगदी पीक म्हणून ...

जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख २३ हजार ४४५ हेक्टर इतक्या क्षेत्रावर मक्याची पेरणी करण्यात आली आहे. खरिपातील नगदी पीक म्हणून मक्याकडे पाहिले जाते. अनेक शेतकरी रब्बी हंगामाच्या भांडवलाचे नियोजन मक्याच्या उत्पन्नातून करत असतात. यामुळे जिल्ह्यातील बहुसंख्य तालुक्यांमध्ये खरिपात मक्याची लागवड होत असते. यावर्षी सुरुवातीला पावसाने ओढ दिल्यामुळे पेरण्यांना उशीर झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी इतर पिकांऐवजी मक्याला पसंती दिल्याने गृहित क्षेत्रापेक्षा १३ हजार हेक्टर इतके अधिक क्षेत्र वाढले आहे. त्रास कमी आणि किमान उत्पन्नाची हमी या भावनेतून शेतकरी या पिकाकडे पाहत असतात.

मात्र मागील दोन-तीन वर्षांपासून मक्यावर होणाऱ्या लष्करी अळीच्या आक्रमणाने शेतकरी त्रस्त बनले आहेत. पूर्णपणे पीक खाणाऱ्या या अळीचा प्रार्दुभाव कमी करण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे. बरे, एकदा औषध फवारणी करून अळी आटोक्यात येईलच असे नाही. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. त्या तुलनेत मक्याला खुल्या बाजारात मिळणारा दर खूपच कमी आहे. केंद्र शासनाने मक्याला १८५० रुपये हमीभाव जाहीर केलेला असला तरी, खुल्या बाजारात इतका दर मिळत नाही. हंगामात १२०० ते १४०० च्या पुढे दर सरकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. झालेला खर्च आणि मिळालेला दर यांची तुलना केली, तर मका विक्रीतूनही शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही उरत नाही. या नैसर्गिक आपत्तीबरोबरच हंगामात खत टंचाईचाही शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. पिकांना खते टाकण्याच्या काळात मागणी वाढते. विशेषत: स्वस्त पडत असल्याने अनेक शेतकरी युरियाला पसंती देतात. जिल्ह्यात युरियाची टंचाई नसल्याचा दावा कृषी विभागाचे अधिकारी करत असले तरी, प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मात्र तो मिळण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक दुकानदार युरिया पाहिजे असेल तर इतर खतेही घ्यावी लागतील, अशी अट घालतात. ही एका अर्थाने शेतकऱ्यांची लूट आहे. टंचाई नसली तरी कृत्रिम टंचाई निर्माण करून ऐन हंगामात शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. यासाठी कृषी विभागाने कडक कारवाई करण्याची गरज आहे.

- संजय दुनबळे