शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
2
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
3
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
4
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
5
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
6
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
7
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
8
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
9
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
10
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
11
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
12
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
13
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
14
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
15
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
16
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
17
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
18
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
19
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
20
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

शेतकरी आंदोलनावरील परिसंवादाने संमेलनाला राजकीय फोडणीचा वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:21 IST

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमपत्रिकेला अद्याप अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही. मात्र, यंदाच्या संमेलनात कोरोनाबाबतचा परिसंवाद, ...

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमपत्रिकेला अद्याप अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही. मात्र, यंदाच्या संमेलनात कोरोनाबाबतचा परिसंवाद, तसेच देशातील शेतकरी आंदोलनाबाबत दोन तासांचा परिसंवाद रंगणार असल्याचे अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले. संमेलनात शेतकरी आंदोलनावर चर्चा करण्याची घोषणा झाल्याने आता संमेलनाला आपसूकच राजकीय फोडणीचा वास येऊ लागला आहे.

भुजबळ फार्म हाऊस येथे झालेल्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा करण्यात आल्याने या चर्चेला अधिकच जोर आला आहे. ठाले पाटील शनिवारपासून नाशिक दौऱ्यावर आले असून, रविवारी त्यांनी पालकमंत्री भुजबळ यांच्यासमवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. साहित्य संमेलनाचे उद्घाटक हे साहित्यिकच राहणार असले तरी ते कोण राहणार याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नसून, त्याबाबतची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचेही ठाले पाटील यांनी नमूद केले. साहित्य संमेलनांमधील परिसंवाद, त्यातील वक्ते, निमंत्रित कवी याबाबतची घोषणाही लवकरच करण्यात येणार आहे, तसेच संमेलनासाठीच्या निमंत्रणांसाठीदेखील १५ मार्चपर्यंत डेडलाइन देण्यात आली असून, त्यापूर्वी सर्व निमंत्रणे रवाना करण्याचे निर्देश दिल्याचेही ठाले पाटील यांनी सांगितले. साहित्य महामंडळ हे काळाबरोबर चालणारे असल्याने यंदाच्या संमेलनात कोरोनाविषयक, तसेच शेतकरी आंदोलनाबाबत प्रत्येकी २ तासांचे परिसंवाद रंगणार असल्याचे ठाले पाटील यांनी नमूद केेले. शेतकरी आंदोलनावर व्यापक परिचर्चा व्हावी, म्हणून याबाबतचा परिसंवाद हा मुख्य मंडपात घेण्यात येणार असल्याचेही ठाले पाटील यांनी नमूद केले.

इन्फो

कामाचे अधिक विकेंद्रीकरण करावे

नाशिककरांनी या काळात संमेलन घेऊन एक मोठे धाडस केले आहे. तरीदेखील आतापर्यंत झालेल्या आढाव्यात सर्व कामे ही योग्य प्रकारे मार्गी लागली असली तरी कामाचे अधिक विकेंद्रीकरण करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कामाला गती मिळू शकणार असल्याचेही ठाले पाटील यांनी सांगितले.

इन्फो

बहिष्कार घालूनही गतवर्षी साडेचार कोटींची पुस्तक विक्री

साहित्य संमेलनाच्या स्टॉल्ससाठी ६,५०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. त्यात कोणतीही कपात होणार नसून, काही प्रकाशकांनी गतवर्षीच्या उस्मानाबाद संमेलनावर बहिष्कार घातला होता. स्वत: स्टॉल्स न घेऊन इतरांच्या स्टॉल्समधून पुस्तक विक्री केली. तरीदेखील त्या संमेलनात ४.५ कोटींची पुस्तक विक्री झाल्याचेही ठाले पाटील यांनी नमूद केले.