शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शेतकरी आंदोलनावरील परिसंवादाने संमेलनाला राजकीय फोडणीचा वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:21 IST

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमपत्रिकेला अद्याप अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही. मात्र, यंदाच्या संमेलनात कोरोनाबाबतचा परिसंवाद, ...

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमपत्रिकेला अद्याप अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही. मात्र, यंदाच्या संमेलनात कोरोनाबाबतचा परिसंवाद, तसेच देशातील शेतकरी आंदोलनाबाबत दोन तासांचा परिसंवाद रंगणार असल्याचे अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले. संमेलनात शेतकरी आंदोलनावर चर्चा करण्याची घोषणा झाल्याने आता संमेलनाला आपसूकच राजकीय फोडणीचा वास येऊ लागला आहे.

भुजबळ फार्म हाऊस येथे झालेल्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा करण्यात आल्याने या चर्चेला अधिकच जोर आला आहे. ठाले पाटील शनिवारपासून नाशिक दौऱ्यावर आले असून, रविवारी त्यांनी पालकमंत्री भुजबळ यांच्यासमवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. साहित्य संमेलनाचे उद्घाटक हे साहित्यिकच राहणार असले तरी ते कोण राहणार याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नसून, त्याबाबतची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचेही ठाले पाटील यांनी नमूद केले. साहित्य संमेलनांमधील परिसंवाद, त्यातील वक्ते, निमंत्रित कवी याबाबतची घोषणाही लवकरच करण्यात येणार आहे, तसेच संमेलनासाठीच्या निमंत्रणांसाठीदेखील १५ मार्चपर्यंत डेडलाइन देण्यात आली असून, त्यापूर्वी सर्व निमंत्रणे रवाना करण्याचे निर्देश दिल्याचेही ठाले पाटील यांनी सांगितले. साहित्य महामंडळ हे काळाबरोबर चालणारे असल्याने यंदाच्या संमेलनात कोरोनाविषयक, तसेच शेतकरी आंदोलनाबाबत प्रत्येकी २ तासांचे परिसंवाद रंगणार असल्याचे ठाले पाटील यांनी नमूद केेले. शेतकरी आंदोलनावर व्यापक परिचर्चा व्हावी, म्हणून याबाबतचा परिसंवाद हा मुख्य मंडपात घेण्यात येणार असल्याचेही ठाले पाटील यांनी नमूद केले.

इन्फो

कामाचे अधिक विकेंद्रीकरण करावे

नाशिककरांनी या काळात संमेलन घेऊन एक मोठे धाडस केले आहे. तरीदेखील आतापर्यंत झालेल्या आढाव्यात सर्व कामे ही योग्य प्रकारे मार्गी लागली असली तरी कामाचे अधिक विकेंद्रीकरण करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कामाला गती मिळू शकणार असल्याचेही ठाले पाटील यांनी सांगितले.

इन्फो

बहिष्कार घालूनही गतवर्षी साडेचार कोटींची पुस्तक विक्री

साहित्य संमेलनाच्या स्टॉल्ससाठी ६,५०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. त्यात कोणतीही कपात होणार नसून, काही प्रकाशकांनी गतवर्षीच्या उस्मानाबाद संमेलनावर बहिष्कार घातला होता. स्वत: स्टॉल्स न घेऊन इतरांच्या स्टॉल्समधून पुस्तक विक्री केली. तरीदेखील त्या संमेलनात ४.५ कोटींची पुस्तक विक्री झाल्याचेही ठाले पाटील यांनी नमूद केले.