शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
3
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
4
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
5
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
6
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
7
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
8
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
9
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
10
जातगणना : मॅजिक की मंडल?
11
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
12
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
13
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
14
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
15
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
16
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
17
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
18
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
19
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
20
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक

नाशकातून किसानसभेचे दुसरे पथक दिल्लीच्या दिशेने रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:15 IST

नाशिक : केंद्र सरकाने आणलेले नवीन कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करीत पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीला ...

नाशिक : केंद्र सरकाने आणलेले नवीन कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करीत पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीला घेराव घालीत गेल्या ३६ दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला ठिंबा देण्यासाठी नाशिकमधून किसानसभेचे दुसरे पथक शनिवारी (दि.२) दिल्लीकडे रवाना झाले आहे. यात नाशिकसह मुंबई, रायगड आणि पालघरमधील आंदोलकांचाही समावेश असून, हे पथक नाशिकमधून अमरावतीमार्गे नागपूरमध्ये दाखल होणार आहे. नागपूरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील किसानसभेचे आंदोलक दाखल होणार असून, रविवारी (दि.३) एकत्रितरीत्या दिल्लीच्या दिशेने कूच करणार आहे.

किसानसभेच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलकांचे पहिले पथक नाशिकमधून दिल्लीकडे रवाना झाल्यानंतर, आता दुसरे पथक नागपूरहून दिल्लीच्या दिशेने कूच करणार आहे. त्यासाठी नाशिकमधील आंदोलक शेतकरी शनिवारी (दि.२) गोल्फ क्लब मैदान येथून दुपारी दोन वाजेच्या सुमारास दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. किसान सभेच्या नेतृत्वात नाशिक शहरातील परिवर्तन वादी पक्ष ,संघटना पदाधिकारी शेतकऱ्यांच्या पथकाला पाठिंबा देण्यासाठी गोल्फ क्लब मैदानावर उपस्थित होते. दुसऱ्या टप्प्यात नाशिकहून दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकरी आंदोलकांच्या पथकाचे नेतृत्व किसान सभेचे राज्यसचिव राजू देसले करणार असून, त्यांच्या समवेत भाकपचे ज्येष्ठ नेते प्रकाश रेड्डी उपस्थित राहणार आहेत.

इन्फो -१

केंद्र सरकारने आणलेले नवीन कृषी उत्पादन, विपणन व व्यापारसंबंधी कायेदे शेतकरी विरोधी असून, हे कायदे रद्द करा. त्याचप्रमाणे, प्रस्तावित वीजबिल विधेयकही रद्द करा, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील शेतकरी दिल्ली येथे सुरू असलेले आंदोलनात लढणाऱ्या शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी किसान सभेच्या नेतृत्वात नाशिकहून निघाले आहेत. या आंदोलकांचे पिंपळगाव बंसवंत, चांदवड येथील शेतकरी स्वागत करणार आहे. त्याचप्रमाणे, धुळे येथे सभा झाल्यानंतर रात्री अमरावतीत मोजरी येथे मुक्कामाचे नियोजन करण्यात आले आहे.

इन्फो- २

आंदोलनक अमरावतीतून ३ जानेवारीला सकाळी निघून दुपारी दोन वाजेच्या सुमारास नागपूरमध्ये दाखल होणार आहेत. या ठिकाणी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय महासचिव अतुल कुमार अंजान यांची सभा होणार आहे. नागपूर येथे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे गट एकत्रित येऊन दिल्लीकडे कूच करणार असून, यात मराठवाड्यातील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांचे विधवा महिलाही सहभागी होणार आहे.

इन्फो-३

प्रवासमार्गात भोजन व्यवस्था, कोरडा शिधाही सोबत

नाशिकमधून दिल्लीच्या दिशेने कूच करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था प्रवासमार्गातील शेतकऱ्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे, दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांसह देशभरातील शेतकऱ्यांच्या भोजनाची सोय वेगवेगळ्या सामाजिक संस्था आणि गुरुद्वारांकडून केली जात आहे. असे असले, तरी नाशिकमधून दिल्लीकडे रवाना होताना आंदोलकांनी संपर्ण प्रवासात आणि दिल्लीतही काही दिवस पुरेल, असा कोरडा शिधा सोबत नेला आहे.