शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

टॅँकरने ओलांडला अडीचशेचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:20 IST

नाशिक : उष्णतेच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडल्याने जिल्ह्णातील ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. जिल्ह्णात ९०१ गावे, वाड्यांतील सुमारे पाच लाख लोकांना पाण्याची दररोज झळ बसत असून, त्यासाठी २५६ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये हेच प्रमाण १६३ गाव-वाड्यांसाठी अवघ्या ५० टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदाची दुष्काळाची भीषण परिस्थिती पाहता, तुलनेने टॅँकरची संख्या पाचपट वाढली आहे.

ठळक मुद्दे९०१ गावे, वाड्यांना टंचाई : १०१ विहिरी अधिग्रहित

नाशिक : उष्णतेच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडल्याने जिल्ह्णातील ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. जिल्ह्णात ९०१ गावे, वाड्यांतील सुमारे पाच लाख लोकांना पाण्याची दररोज झळ बसत असून, त्यासाठी २५६ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये हेच प्रमाण १६३ गाव-वाड्यांसाठी अवघ्या ५० टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदाची दुष्काळाची भीषण परिस्थिती पाहता, तुलनेने टॅँकरची संख्या पाचपट वाढली आहे.गेल्या वर्षी सरासरीपेक्षा फक्त ८२ टक्केच पाऊस झाल्यामुळे नदी, नाले, धरणांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. विशेषत: सिन्नर, चांदवड, नांदगाव, येवला या तालुक्याकडे पावसाने वक्रदृष्टी केल्याने भर पावसाळ्यातही या तालुक्यांना पिण्याचे पाणी टॅँकरद्वारे पुरवावे लागले. साधारणत: आॅक्टोबरपासूनच जिल्ह्णात पाणीटंचाई जाणवण्याची चिन्हे दिसू लागत असताना डिसेंबरमध्ये टॅँकरची मागणी सुरू झाली. परंतु जलयुक्त शिवार योजनेचा जिल्ह्णात ढिंडोरा पिटला जात असताना टंचाईग्रस्त गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केल्यास प्रशासनाचे पितळ उघडे पडण्याच्या भीतीमुळे प्रशासनाने ग्रामीण भागात टॅँकर सुरू करण्यास चालढकल चालविली होती. अखेर लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचा दबावामुळे प्रशासनाने फेब्रुवारीत टॅँकर सुरू केले. मार्च महिन्यापासून दर आठवड्याला टॅँकरची संख्या वाढू लागली असून, एप्रिलअखेरपर्यंत ही संख्या २५६ पर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्णातील बागलाण, चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव, सुरगाणा, सिन्नर व येवला या आठ तालुक्यातील २०७ गावे व ६९४ वाड्या अशा ९०१ गावांतील सुमारे पाच लाख लोकवस्तीला पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. टॅँकरबरोबरच १०१ खासगी विहिरीही अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. या विहिरीतून गावासाठी पिण्याच्या पाण्याची तसेच काही गावांसाठी टॅँकर भरण्याच्या कामी या विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. धरणात फक्त १८ टक्के पाणी उष्णतेचे वाढते प्रमाण व पाण्याची सातत्याने होणारी मागणी पाहता, जिल्ह्णातील धरणांची पातळी कमालीची खालावली आहे. लहान-मोठ्या २४ प्रकल्पांमध्ये जेमतेम १८ टक्केपाणी शिल्लक राहिले असून, पुणेगाव, नांदुरमध्यमेश्वर, भोजापूर, नागासाक्या, माणिकपुंज ही धरणे कोरडीठाक पडली आहेत, तर नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात ३० टक्के साठा असून, समूहात २५ पाणी साठा आहे. दारणा २१ टक्के, तर ओझरखेडमध्ये १६ टक्के पाणी शिल्लक आहे.