शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

टॅँकरने ओलांडला अडीचशेचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:20 IST

नाशिक : उष्णतेच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडल्याने जिल्ह्णातील ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. जिल्ह्णात ९०१ गावे, वाड्यांतील सुमारे पाच लाख लोकांना पाण्याची दररोज झळ बसत असून, त्यासाठी २५६ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये हेच प्रमाण १६३ गाव-वाड्यांसाठी अवघ्या ५० टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदाची दुष्काळाची भीषण परिस्थिती पाहता, तुलनेने टॅँकरची संख्या पाचपट वाढली आहे.

ठळक मुद्दे९०१ गावे, वाड्यांना टंचाई : १०१ विहिरी अधिग्रहित

नाशिक : उष्णतेच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडल्याने जिल्ह्णातील ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. जिल्ह्णात ९०१ गावे, वाड्यांतील सुमारे पाच लाख लोकांना पाण्याची दररोज झळ बसत असून, त्यासाठी २५६ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये हेच प्रमाण १६३ गाव-वाड्यांसाठी अवघ्या ५० टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदाची दुष्काळाची भीषण परिस्थिती पाहता, तुलनेने टॅँकरची संख्या पाचपट वाढली आहे.गेल्या वर्षी सरासरीपेक्षा फक्त ८२ टक्केच पाऊस झाल्यामुळे नदी, नाले, धरणांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. विशेषत: सिन्नर, चांदवड, नांदगाव, येवला या तालुक्याकडे पावसाने वक्रदृष्टी केल्याने भर पावसाळ्यातही या तालुक्यांना पिण्याचे पाणी टॅँकरद्वारे पुरवावे लागले. साधारणत: आॅक्टोबरपासूनच जिल्ह्णात पाणीटंचाई जाणवण्याची चिन्हे दिसू लागत असताना डिसेंबरमध्ये टॅँकरची मागणी सुरू झाली. परंतु जलयुक्त शिवार योजनेचा जिल्ह्णात ढिंडोरा पिटला जात असताना टंचाईग्रस्त गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केल्यास प्रशासनाचे पितळ उघडे पडण्याच्या भीतीमुळे प्रशासनाने ग्रामीण भागात टॅँकर सुरू करण्यास चालढकल चालविली होती. अखेर लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचा दबावामुळे प्रशासनाने फेब्रुवारीत टॅँकर सुरू केले. मार्च महिन्यापासून दर आठवड्याला टॅँकरची संख्या वाढू लागली असून, एप्रिलअखेरपर्यंत ही संख्या २५६ पर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्णातील बागलाण, चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव, सुरगाणा, सिन्नर व येवला या आठ तालुक्यातील २०७ गावे व ६९४ वाड्या अशा ९०१ गावांतील सुमारे पाच लाख लोकवस्तीला पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. टॅँकरबरोबरच १०१ खासगी विहिरीही अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. या विहिरीतून गावासाठी पिण्याच्या पाण्याची तसेच काही गावांसाठी टॅँकर भरण्याच्या कामी या विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. धरणात फक्त १८ टक्के पाणी उष्णतेचे वाढते प्रमाण व पाण्याची सातत्याने होणारी मागणी पाहता, जिल्ह्णातील धरणांची पातळी कमालीची खालावली आहे. लहान-मोठ्या २४ प्रकल्पांमध्ये जेमतेम १८ टक्केपाणी शिल्लक राहिले असून, पुणेगाव, नांदुरमध्यमेश्वर, भोजापूर, नागासाक्या, माणिकपुंज ही धरणे कोरडीठाक पडली आहेत, तर नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात ३० टक्के साठा असून, समूहात २५ पाणी साठा आहे. दारणा २१ टक्के, तर ओझरखेडमध्ये १६ टक्के पाणी शिल्लक आहे.