शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

दहावीच्या निकालास उशीर झाल्यास शाळाच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:10 IST

नाशिक : दहावीच्या मूल्यमापन प्रक्रियेत शाळांच्या गुणदान प्रक्रियेची मुदत उलटूनही अद्याप अनेक शाळांनी ऑनलाईन निकाल भरण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली ...

नाशिक : दहावीच्या मूल्यमापन प्रक्रियेत शाळांच्या गुणदान प्रक्रियेची मुदत उलटूनही अद्याप अनेक शाळांनी ऑनलाईन निकाल भरण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. अशा स्थितीत निकालाला उशीर होऊ नये म्हणून शाळांना निकाल ऑनलाइन भरणे व निश्चितीची कामे प्राधान्याने एकाच वेळी करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. शाळेकडून हलगर्जीमुळे निकाल रखडल्यास संबंधित शाळाच जबाबदार राहणार आहेत. त्यामुळे कामाला गती देऊन गांभीर्याने निकालाची प्रक्रिया पूर्ण करा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील दहावीच्या ९८ हजार ९४९ विद्यार्थ्यांच्या नववीची परीक्षा व दहावीचे मूल्यांकनावर निकाल लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संगणकीय प्रणालीवर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचा निकाल भरण्यास २३ जूनला सुरुवात झाली असून ही मुदत ३० जूनला संपुष्टात आल्यानंतर २ जुलैपर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत उलटूनही जिल्ह्यातील केवळ ६० टक्के विद्यार्थ्यांचीच माहिती भरली गेली; असून आतापर्यंत गुणदान पूर्ण व अंतिम न झाल्याने प्रमाण ४० टक्के आहे. त्यामुळे शिक्षकांनी निकाल भरुन ते त्याच वेळी निश्चित करण्याचे काम गांभीर्याने करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून शाळांना देण्यात आल्या असून सोमवार (दि.५) पासून संबंधित शिक्षकांना त्यांनी तयार केलेले गुणदानपत्रक विभागीय शिक्षण मंडळ कार्यालयात जमा करावे लागणार आहे.

---

मूल्यांकनानंतर मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत निकाल २ जुलैपर्यंत भरण्याची अंतिम मुदत होती. रविवारी

रात्रीपर्यंत केवळ ६० टक्के विद्यार्थ्यांचे निकाल भरून निश्चिती शाळांकडून करण्यात आली. तर उर्वरित ३० टक्के विद्यार्थ्यांची माहिती भरली गेली; पण निश्चिती केली नाही. याशिवाय १० टक्के विद्यार्थ्यांचे निकाल अपूर्ण आहेत. त्यामुळे सोमवारपासून निकाल भरण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे.

---

निकाल संकलनाला उशीर झालेल्या शिक्षकांना ऑनलाइन भरण्यासाठी वाढवून वेळ मिळाला पाहिजे. पासवर्ड रिसेट करून काहींना उशिरा मिळाला. त्यामुळे शिक्षकांना निकाल भरण्यासाठी दोन-तीन दिवसांची मुदतवाढ मिळाली पाहिजे.

- एस. बी देशमुख, सचिव, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ.

--

वेळेत निकालाचे संकलन केले. त्यामुळे निकाल भरण्यात अडचण आली नाही; मात्र ज्यांना अडचणी आल्यात त्यांना मुदतवाढ मिळावी. निकालपत्र सादर करण्यासाठी २ जुलै पर्यंत मुदत होती. परंतु शिक्षण मंडळाने ही मुदत ९ जुलै पर्यंत वाढवून दिल्याने शिक्षकांना सोयीचे झाले.

- किशोर पालखेडकर, मुख्याध्यापक, नवरचना विद्यालय .

---

अद्याप निकालाचे काम पूर्ण झालेले नाही. गुणदान पद्धती नवीन असल्याने सुरुवातीला शिक्षकांना काही अडचणी आल्या असल्या तरी आता वेगाने काम सुरू असून जसे निकाल तयार होतील तेव्हाच निश्चिती केल्यास निकाल लवकर भरल्या जातील.

- के. बी. पाटील, अध्यक्ष, विभागीय परीक्षा मंडळ, नाशिक

--

पॉइंटर-

६० टक्के शाळांचा टप्पा पूर्ण

दहावीतील विद्यार्थी - ९८,९४९

मुले -५२,८०३

मुली - ४६,१४६