शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

योजना : चांदवड तालुक्यातील २२ गावांचा समावेश

By admin | Updated: January 22, 2015 00:27 IST

जलयुक्त शिवार अभियानास प्रारंभ

दरेगाव : चांदवड तालुका दुष्काळी तालुका असून, येथील अनेक गावे ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असणारी आहेत. राज्य शासनाने राज्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानास सुरुवात केली आहे. लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून जलसंधारणाची एकात्मिक योजना राबविण्यात येत आहे.राज्य शासनाने प्राधान्याने हा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामुळे तलाव, सीमेंट, नालाबंधारे, माती नाला बंधारे यातील वर्षानुवर्षे साठलेला गाळ काढणे शक्य होणार आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकटीकरण करणे, दुरुस्ती करणे, जलफेरभरण व गाळ काढणे, खोल सलग समतल चर या बाबींवर जलयुक्त शिवार अभियानात ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असणाऱ्या गावात प्राधान्याने उपाययोजना करण्यात येणार आहे. पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार करण्यात आले आहे. त्यात पहिल्या टप्प्यात मेसनखेडे खुर्द, कानडगाव, नारायणखेडे, कातरवाडी, वडगावपंगू या गावांचा समावेश आहे. तसेच त्यानंतर दरेगाव, डोणगाव, रायपूर, वाद, वराडी, कुंदलगाव, दहेगाव, भडाणे, निंबाळे, आडगाव, आसरखेडे, पाटे, गोहरण, मेसनखेडे बुद्र्रूक, हट्टी या गावांचा समावेश करण्यात आला आहे. (वार्ताहर)