शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

योजना : चांदवड तालुक्यातील २२ गावांचा समावेश

By admin | Updated: January 22, 2015 00:27 IST

जलयुक्त शिवार अभियानास प्रारंभ

दरेगाव : चांदवड तालुका दुष्काळी तालुका असून, येथील अनेक गावे ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असणारी आहेत. राज्य शासनाने राज्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानास सुरुवात केली आहे. लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून जलसंधारणाची एकात्मिक योजना राबविण्यात येत आहे.राज्य शासनाने प्राधान्याने हा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामुळे तलाव, सीमेंट, नालाबंधारे, माती नाला बंधारे यातील वर्षानुवर्षे साठलेला गाळ काढणे शक्य होणार आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकटीकरण करणे, दुरुस्ती करणे, जलफेरभरण व गाळ काढणे, खोल सलग समतल चर या बाबींवर जलयुक्त शिवार अभियानात ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असणाऱ्या गावात प्राधान्याने उपाययोजना करण्यात येणार आहे. पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार करण्यात आले आहे. त्यात पहिल्या टप्प्यात मेसनखेडे खुर्द, कानडगाव, नारायणखेडे, कातरवाडी, वडगावपंगू या गावांचा समावेश आहे. तसेच त्यानंतर दरेगाव, डोणगाव, रायपूर, वाद, वराडी, कुंदलगाव, दहेगाव, भडाणे, निंबाळे, आडगाव, आसरखेडे, पाटे, गोहरण, मेसनखेडे बुद्र्रूक, हट्टी या गावांचा समावेश करण्यात आला आहे. (वार्ताहर)