दिंडोरी तालुक्यात महिनाभर पावसाने दडी मारल्याने धरणसाठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, सध्या तालुक्याच्या पश्चिम भागात पाऊस पडत असल्यामुळे वाघाड धरणाची पाणी पातळी २.६६ टक्के, वरुण २६.१० इतकी झालेली असून, करंजवण धरणात जुलैच्या मध्यापर्यंत ६.५० टक्के इतका पाणीसाठा होता. तो आता १०.३५% इतका झाला आहे, तर पालखेड धरणात २९.४३ टक्के पाणीसाठा होता, तो ३६.१८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे, तर पुणेगाव धरणामध्ये ६.६८ टक्के पाणी शिल्लक होते, त्यात किरकोळ वाढ होऊन ७ टक्के झाली आहे, तसेच ओझरखेंड धरणात २५.४३ टक्के पाणीसाठा होता, तो आता २५.६४ टक्के इतका झाला आहे. तिकडे तिसगाव धरणात पाणीसाठा ०.७७ टक्के होता, तो आता ०.८६ टक्के इतका झाला आहे. सध्या फक्त वाघाड, करंजवण, पालखेड धरणात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. पुणेगाव, ओझरखेंड, तीरगाव धरणक्षेत्रात कमी पावसामुळे पाणीसाठा वाढलेला नाही.
दिंडोरी तालुक्यातील धरणातील पाण्यावर इतर तालुक्यातील जनतेचे पुढील भवितव्य अवलंबून असल्यामुळे सर्वांच्या नजरा दिंडोरी तालुक्याच्या धरणातील पाणीसाठ्यावर असतात.
250721\25nsk_36_25072021_13.jpg
दिंडोरी पाऊस