शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सिंगल फेज रोहित्र जोडल्याने ग्रामस्थात समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 18:27 IST

औदाणे : औदाणे (ता बागलाण) येथील गावाला सिंगल फेज योजनेचा पुरवठा करणारा विद्युत रोहीत्र दोन वेळेस अवघ्या पंधरा दिवसातच जळाल्याने शेतकऱ्यांच्या मोटारी, पिकावरील औषध फवारणी बंद असल्याने मुलभुत गरजा थांबल्या होत्या व वीज कंपनीकडून दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमधे तीव्र संताप व्यक्त केला जात होता.

ठळक मुद्देऔदाणे : पंधरा दिवसातच दोन वेळेस रोहित्र जळाल्याने गाव होते अंधारात

प्रभाव लोकमतचाऔदाणे : औदाणे (ता बागलाण) येथील गावाला सिंगल फेज योजनेचा पुरवठा करणारा विद्युत रोहीत्र दोन वेळेस अवघ्या पंधरा दिवसातच जळाल्याने शेतकऱ्यांच्या मोटारी, पिकावरील औषध फवारणी बंद असल्याने मुलभुत गरजा थांबल्या होत्या व वीज कंपनीकडून दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमधे तीव्र संताप व्यक्त केला जात होता.याबाबतचे वृत बुधवारी (दि.२८) लोकमतमधे फोटो सह प्रसिद्ध झाले होते. त्यावेळी विज वितरण कंपनीकडुन तात्काळ कार्यवाही करु न दखल घेऊन गावात सिंगल फेज योजनेचे रोहित्र जोडले गेल्याने शेतकºयांचा पोळा सणाला गांव प्रकाशमय झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.येथील गावात सिंगल फेज योजनेच पंधरा दिवसात दोन वेळेस रोहत्र जळाले होते.आठ दिवसापुर्वी एक डिपी जळाली होती. सिगंल फेज योजना कार्यान्वीत नसल्याने फवारणी करता येत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत होते.लोड शेडींगचा दाब जास्त असल्याने हे डबे जळत असल्याचे वीज कंपनीचे म्हणने आहे. मात्र जास्त विजेचा दाब वाढल्यास हे डबे केव्हा जळतील याचा भरोसा नसल्याने गांवात केव्हा ही अंधार पडु शकतो असे ग्रामस्थांचे म्हणने होते व ऐन पोळा सणाच्या दिवशी गांव अधाराच्या सावटाखाली होते व पोळा सण साजरा होईल की नाही हया संभ्रामात ग्रामस्थ होते.पिठाच्या गिरण्या मोटारी बंद असल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत होता विज कंपनीने जादा केव्हीचे ट्रान्सफॉर्मर विजेचा सिंगल फेज योजनेचे डबे जोडावे अशी मागणी नागरीकांकडुन होत होती अखेर गांव प्रकाशमय होऊन व्वहार सुरळीत सुरु झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.चौकट.....डीपी जळाल्याची माहिती महावितरण कंपनीला देऊनही दुर्लक्ष केले जात होते. गेल्या पंधरा दिवसात सिंगल फेज योजनेचे दोन वेळेस रोहित्र जळाले, त्यामुळे गांवातील पिठाच्या गिरण्या व शेतकºयांच्या मोटारी, पिण्याचे पाणी बंद असल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत होता.विज कंपनीच्या अधिकाºयांना कळवूनही उडवा उडवीचे उतर देऊन दुर्लक्ष केले जात होते, ऐन पोळा सणाला गांव प्रकाशमय झाल्याने ग्रामस्थ समाधानी आहेत. मात्र हे डीपी केव्हा जळेल याचा भरोसा नसल्याने विज कंपनीने जास्त विजेचा ट्रान्सफार्मर जोडल्यास कायमस्वरुपी ही समस्या मिटेल.- गणेश निकम, ग्रामस्थ, औंदाणे.