शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

विश्वाचा शोध घेण्यासाठी सॅटेलाइट तंत्रज्ञान उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:13 IST

वैदिककाळापासून पृथ्वी असून ऋतू, नक्षत्र, शेतीचे हंगाम तेव्हाही होते. वेदांगकाळातही विज्ञान प्रगत होते, त्याचे कोनात्मक आणि कलात्मक परिणाम मिळत ...

वैदिककाळापासून पृथ्वी असून ऋतू, नक्षत्र, शेतीचे हंगाम तेव्हाही होते. वेदांगकाळातही विज्ञान प्रगत होते, त्याचे कोनात्मक आणि कलात्मक परिणाम मिळत गेले. त्यातून ६० पळे म्हणजे एक घटिका, ६० घटिका म्हणजे एक दिवस, ३० दिवस म्हणजे एक मास आणि १२ मास म्हणजे एक वर्ष...हे शोधले गेले.

आर्यभट्टांनी लावलेला शून्याचा शोध खगोलशास्राशी निगडित होता. धर्म आणि खगोलशास्राचे वितुष्ट बरेच काळ होते. कंकणाकृती ग्रहण पाहिल्याने समाजाने आर्यभट्टांवर बहिष्कार टाकल्याचे सुजाता बाबर यांनी सांगितले. बीजगणिताचे जनक भास्कराचार्य यांनी राहू, केतू हे बिंदू शोधून काढले. पायथागोरस सिद्धान्तानुसार ताऱ्यांचे अंतर मोजता आले. ॲरिस्टॉटलने पृथ्वी गोल असण्याचे संदर्भ दिलेत. गॅलिलिओने गुरूचे उपग्रह पाहिले, तर आइन्स्टाइन यांनीही मोठे योगदान दिल्याचे बाबर यांनी स्पष्ट केले.

प्राचीन काळातच ताऱ्यांची नोंदणी झाली. दर्पणकार जांभेकर यांनी त्यांना मराठीत नावे शोधली. सप्तर्षी तारासमूहातून दिशा स्पष्ट होतात. राशी आणि नक्षत्र या भारतीय संकल्पना असून ऋतू-राशींचा जवळचा संबंध असल्याची माहिती बाबर यांनी दिली. विसाव्या शतकाच्या मध्यावर सॅटेलाइट तंत्रज्ञान जन्माला आले. त्यातूनच पुढे रशिया व अमेरिकेत शीतयुद्ध सुरू झाले. १९५६ साली रशियाने स्पुटनिक यान पाठविले, पण १३ वर्षांनंतर अमेरिकेने चंद्रावर माणूस उतरविला. भारतात इस्रो संस्था असून, सॅटेलाइट तंत्रज्ञानाचा मोठा फायदा असल्याचे बाबर यांनी सांगितले. या क्षेत्रात करिअर करण्याची संधी म्हणून खगोलशास्राला नवी पिढी निवडू शकते, असा सल्लाही सुजाता बाबर यांनी दिला. यावेळी मालेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर शाह, मिलिंद बाबर उपस्थित होते. मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले, तर चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.

आजचे व्याख्यान

वक्ते - सुनील कुटे

विषय - नाशिकचे पाणी