शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

विश्वाचा शोध घेण्यासाठी सॅटेलाइट तंत्रज्ञान उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:13 IST

वैदिककाळापासून पृथ्वी असून ऋतू, नक्षत्र, शेतीचे हंगाम तेव्हाही होते. वेदांगकाळातही विज्ञान प्रगत होते, त्याचे कोनात्मक आणि कलात्मक परिणाम मिळत ...

वैदिककाळापासून पृथ्वी असून ऋतू, नक्षत्र, शेतीचे हंगाम तेव्हाही होते. वेदांगकाळातही विज्ञान प्रगत होते, त्याचे कोनात्मक आणि कलात्मक परिणाम मिळत गेले. त्यातून ६० पळे म्हणजे एक घटिका, ६० घटिका म्हणजे एक दिवस, ३० दिवस म्हणजे एक मास आणि १२ मास म्हणजे एक वर्ष...हे शोधले गेले.

आर्यभट्टांनी लावलेला शून्याचा शोध खगोलशास्राशी निगडित होता. धर्म आणि खगोलशास्राचे वितुष्ट बरेच काळ होते. कंकणाकृती ग्रहण पाहिल्याने समाजाने आर्यभट्टांवर बहिष्कार टाकल्याचे सुजाता बाबर यांनी सांगितले. बीजगणिताचे जनक भास्कराचार्य यांनी राहू, केतू हे बिंदू शोधून काढले. पायथागोरस सिद्धान्तानुसार ताऱ्यांचे अंतर मोजता आले. ॲरिस्टॉटलने पृथ्वी गोल असण्याचे संदर्भ दिलेत. गॅलिलिओने गुरूचे उपग्रह पाहिले, तर आइन्स्टाइन यांनीही मोठे योगदान दिल्याचे बाबर यांनी स्पष्ट केले.

प्राचीन काळातच ताऱ्यांची नोंदणी झाली. दर्पणकार जांभेकर यांनी त्यांना मराठीत नावे शोधली. सप्तर्षी तारासमूहातून दिशा स्पष्ट होतात. राशी आणि नक्षत्र या भारतीय संकल्पना असून ऋतू-राशींचा जवळचा संबंध असल्याची माहिती बाबर यांनी दिली. विसाव्या शतकाच्या मध्यावर सॅटेलाइट तंत्रज्ञान जन्माला आले. त्यातूनच पुढे रशिया व अमेरिकेत शीतयुद्ध सुरू झाले. १९५६ साली रशियाने स्पुटनिक यान पाठविले, पण १३ वर्षांनंतर अमेरिकेने चंद्रावर माणूस उतरविला. भारतात इस्रो संस्था असून, सॅटेलाइट तंत्रज्ञानाचा मोठा फायदा असल्याचे बाबर यांनी सांगितले. या क्षेत्रात करिअर करण्याची संधी म्हणून खगोलशास्राला नवी पिढी निवडू शकते, असा सल्लाही सुजाता बाबर यांनी दिला. यावेळी मालेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर शाह, मिलिंद बाबर उपस्थित होते. मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले, तर चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.

आजचे व्याख्यान

वक्ते - सुनील कुटे

विषय - नाशिकचे पाणी