शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

टॅँकर सुरू होत नसल्याने सरपंचांचा राजीनामा

By admin | Updated: February 1, 2016 23:38 IST

निमगाव, सिन्नर : खासदार, आमदार शिवसेनेचे असूनही उपयोग नाही

सिन्नर : शिवसेनेचे सिन्नर तालुका उपप्रमुख व निमगाव-सिन्नरचे सरपंच बाळासाहेब सानप यांनी गावासाठी पिण्याच्या पाण्याचा टॅँकर सुरू होत नसल्याने सरपंचपदाचा राजीनामा आमदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे सुपूर्द केला.राज्यात सेना-भाजपाचे सरकार आहे. नाशिकचे खासदार व सिन्नरचे आमदार शिवसेनेचे असताना तसेच सरपंचही शिवसेनेचा असूनही गावात पिण्याच्या पाण्याचा टॅँकर सुरू नसेल तर त्या सरपंच पदाचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित करीत सानप यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला. सरपंच पदाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांची साथ मिळत नसल्याने पाण्यासाठी गावातील महिलांचे होणारे हाल आपल्याला पाहावत नसल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. निमगाव-सिन्नर येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. निमगावच्या वाड्यावस्त्यांवर एका टॅँकरच्या दोन फेऱ्या सुरू आहेत. गावातील सार्वजनिक पाणीपुरवठ्याची विहिरीनेही तळ गाठल्याने गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावातील विहिरीचे पाणी आटत आले असतानाच आपण वाढीव टॅँकरचा प्रस्ताव तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर केल्याचा दावा सानप यांनी केला आहे. सार्वजनिक विहीर पूर्णपणे आटलेली असताना मागणी करूनही गावासाठी टॅँकर सुरू होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गावात चार हातपंप असून, त्यापैकी तीन बंद आहेत. त्यामुळे एका हातपंपावर पाणी भरण्यासाठी महिलांची पहाटेपासूनच मोठी गर्दी होते. गावात तीन सार्वजनिक विहिरी असून, दलितवस्तीवरील विहिरीला केवळ दोन फूट पाणी असून, ते केवळ आठ दिवस पुरेल असे सानप यांचे म्हणणे आहे. गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना तहसीलदार ग्रामस्थांची टंचाईच्या विषयावर चेष्टा करीत असल्याचा आरोपही सानप यांनी केला आहे. पिण्याच्या पाण्याचा टॅँकर सुरू करण्यासाठी अनेकदा पाठपुरावा करूनही टॅँकर सुरू केला जात नसल्याचे सानप यांनी म्हटले आहे. सुमारे साडेतीन हजार लोकसंख्या असलेल्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होत असल्याने तहसीलदारांच्या कारभाराला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचे सानप यांनी स्पष्ट केले आहे. आमदार राजाभाऊ वाजे यांनी तहसीलदारांवर अंकुश ठेवावा, अशी मागणीही सानप यांनी केली आहे. (वार्ताहर)