शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

मुस्लीम बांधवांचे सामुहिक नमाजपठण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 13:17 IST

शहरातील ईदगाहवर सकाळी साडे आठ वाजेपासूनच मुस्लीम बांधवांचे आगमन सुरू झाले होते. तासाभरात निम्म्यापेक्षा अधिक मैदान गर्दीने फुलले. धर्मगुरू मौलाना मुफ्ती महेबुब आलम यांचे प्रवचन सुरू झाले.

ठळक मुद्दे ईदगाहवर सकाळी साडे आठ वाजेपासूनच मुस्लीम बांधवांचे आगमनशहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली नमाजपठण पारंपरिक पोशाखामध्ये आबालवृद्ध मैदानात जमले ‘तलाक’ इस्लामला मान्य नाही. तलाकची वेळ दांपत्यांनी येऊ देऊ नये.

नाशिक : शहरातील ईदगाहवर सकाळी साडे आठ वाजेपासूनच मुस्लीम बांधवांचे आगमन सुरू झाले होते. तासाभरात निम्म्यापेक्षा अधिक मैदान गर्दीने फुलले. दरम्यान, धर्मगुरू मौलाना मुफ्ती महेबुब आलम यांचे प्रवचन सुरू झाले. त्यांनी ‘बकरी ईद व इस्लाम’ या विषयावर प्रकाश टाकला. सूर्यप्रकाश पडल्याने इदगाहच्या मुख्य नमाजपठणाच्या सोहळ्यावर असलेले पावसाचे सावट दुरू झाले. प्रवचनानंतर शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली नमाजपठणाला सुरूवात झाली. डोक्यावर हिरवा, पांढरा फेटा, पठाणी कुर्ता, इस्लामी टोपी अशा पारंपरिक पोशाखामध्ये आबालवृद्ध यावेळी मैदानात जमले होते. तत्पूर्वी मैदानाच्या दोन्ही प्रवेशद्वारालगत तात्पुरत्या स्वरूपात बसविण्यात आलेल्या नळांवरून समाजबांधव शुचिर्भूत (वजू) झाले.

इदगाह व सुन्नी मरकजी सिरत समितीचे हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी यांनी उपस्थिताना ईद व इदगाहचे महत्त्व पटवून सांगत ‘तलाक’ इस्लामला मान्य नाही. तलाकची वेळ दांपत्यांनी येऊ देऊ नये, असे आवाहन केले. सव्वा दहा वाजता खतीब यांनी ध्वनिक्षेपकावर येत उपस्थिताना विशेष नमाजपठणाच्या पद्धतीची माहिती दिली आणि नमाजपठणाला सुरुवात झाली. उपस्थित हजारो समाजबांधवांनी पारंपरिक पद्धतीने नमाज उत्साहात अदा केली

विश्वशांतीसाठी प्रार्थनासर्व मानवजातीसह भारत आणि विश्वाच्या कल्याणासाठी दुआ नमाजपठणानंतर खतीब यांनी विशेष दुआ केली. समाजातील सर्वच घटकांच्या विकासाबाबत खतीब यांनी दुआ मागितली. उपस्थितांनी त्यांच्या प्रार्थनेला ‘आमीन’ शब्द उच्चारत प्रतिसाद दिला. दरम्यान, भारतावर वक्रदृष्टी करणाºया दहशतवादी संघटना नेस्तनाबूत व्हाव्या आणि देशात अमन व शांती कायम नांदावी, अशी प्रार्थना करण्यात आली. सर्वांनी उभे राहुन प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर आधारित दरुदोसलामचे सामुहिक पठण केले. नमाजपठणाचा सोहळ्याचा समारोप उत्साहात व शांततेत झाला.