शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
4
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
5
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
6
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
7
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
8
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
9
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
10
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
11
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
12
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
13
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
14
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
15
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
16
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
17
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
18
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
19
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
20
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध

वादळवाराच ठरविणार साधुग्रामचा दर्जा?

By admin | Updated: June 18, 2015 00:07 IST

त्र्यंबकेश्वर : साधुग्रामचे काम रामभरोसे सुरू; पावसाळा असूनही प्रशासन मात्र निश्चिंत

नाशिक : येथील साधुग्रामच्या कामांचा दर्जा कोणतीही यंत्रणा अथवा समिती ठरविणार नाही, तर पाऊस आणि वादळवाऱ्यात होणाऱ्या नुकसानीनंतर येथील कामाच्या दर्जाविषयी बोलता येईल, असा पवित्रा जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. पावसामुळे नाशिकच्या साधुग्रामची दैना झाल्याचा अनुभव असतानाही त्र्यंबकेश्वरच्या साधुग्रामची कामे नाशिकप्रमाणेच सुरू आहे. विशेष म्हणजे येथील साधू-महंतांकडूनही कोणतीच हरकत घेण्यात आली नसून, दर्जाबाबत त्यांनीही मौन बाळगल्याने ऐन पावसाळ्यात जिल्हा प्रशासनाची धावपळ उडण्याची शक्यता आहे. जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे नाशिकमधील साधुग्रामची दैना झाल्याचा अनुभव असतानाही त्र्यंबकेश्वर येथील साधुग्रामच्या कामाबाबत जिल्हा प्रशासनाकडून दखल घेतली गेली नसल्याचे समजते. नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे येथील साधुग्राममध्ये बांधण्यात आलेल्या शौचालयांचे पत्रे उडून गेले होते. अनेक शेड्स कोलमडून पडले होते तर ठिकठिकाणचा मुरूम वाहून गेल्याने पाण्याचे डबके साचले होते. या पावसातच केलेल्या कामांचा दर्जा उघड झाल्याने जिल्हा प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. वास्तविक नाशिकपेक्षा त्र्यंबकेश्वरला पावसाची कृपा जास्त असते. पावसाळ्यात सातत्याने पावसाच्या सरी कोसळत असतात. डोगर कड्यांनी व्यापलेल्या त्र्यंबकेश्वरला पावसाबरोबरच वाराही वाहत असतो. अशा वातावरणात येथील साधुग्रामची कामे मजबूत होणे अपेक्षित आहे. त्याच पद्धतीने कामे केली जात असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. नाशिकच्या कामांबाबतही असेच बोलले जात होते. परंतु एकाच पावसात कामांचा दर्जा उघड झाला होता. त्यामुळे त्र्यंबकेश्वर येथील साधुग्रामच्या कामांच्या दर्जाबाबत अधिक काम करता येणे शक्य असताना प्रशासनाकडून मात्र फारसे गांभीर्य दाखविले जात नसल्याचे दिसते. पाऊस आणि वाऱ्यात साधुग्राम आणि तंबूंची काय अवस्था होते, यावरून येथील कामांचे मूल्यमापन ठरविण्याचा अजब फंडा प्रशासनाचा आहे.