शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

गोवंश पवित्र ना, मग इतरही पशुहत्त्या करू नका

By admin | Updated: August 3, 2015 23:16 IST

! ‘पेटा’चे आवाहन : कुंभमेळ्यातील भाविकांसाठी लावले फलक

नाशिक : गाय पवित्र असल्याने ज्याप्रमाणे गायींची हत्त्या केली जात नाही आणि मांसाहार केला जात नाही, त्याप्रमाणे कोंबडी आणि अन्य प्राण्यांची मांसाहारासाठी हत्त्या कशासाठी करता, असा प्रश्न पेटा या प्राणिमित्र संघटनेने केला असून, कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना मांसाहार टाळा, असे आवाहन करणारे फलक ठिकठिकाणी लावण्यास प्रारंभ केला आहे.कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये लाखो भाविक येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पीपल फॉर द इथिकल ट्रिटमेंट आॅफ अ‍ॅनिमल्स पेटाने जनजागृतीचे अभियान सुरू केले आहे आणि मांसाहारासाठी पशुहत्त्या करू नका, असे आवाहन केले आहे. कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा मानला जातो. हिंदू गायींना पवित्र मानत असल्याने गायींना ठार मारणे पाप मानले जाते. मग इतर प्राण्यांकडे त्याच भावनेने बघून त्यांचे भक्षण करणेही थांबवायला हवे, असे आवाहन पेटाने केले आहे. कोंबड्यादेखील गायींना त्यांच्या पिल्लांसाठी जागरूक आणि छळाप्रती संवेदनशील असतात. तरीही त्यांंना अगदी निर्दयपणे ठार मारले जाते, असे पेटाच्या आहारतज्ज्ञ भुवनेश्वरी यांनी म्हटले आहे. मांसाहारासाठी कोंबड्यांचा वापर करणारे कारखाने कोंबड्यांना अंधाऱ्या खोलीत ठेवतात. तेथील उग्रवासात त्यांना राहावे लागते. इतकेच नव्हे तर या प्राण्यांना मारण्यासाठी वाहनातून नेले जाते. तेथे गुदमरून किंवा इजा होऊन अनेक कोंबड्या मरतात. अशाच प्रकारे शेळ्या आणि मासेही निर्दयपणे मारले जातात, असे पेटाचे म्हणणे आहे.शाकाहार करणारा मांसाहाराच्या तुलनेत अधिक तंदुरुस्त असतो. शाकाहार करणाऱ्याला हृदयविकार, मधुमेह, कर्करोग आणि अन्य आजार होण्याची शक्यता कमीच असते. भारतात हे सर्व मोठे आजार सर्वाधिक असल्यामुळे शाकाहारी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)