शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कुणीही चालवा पण एकदाची चाके फिरू द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST

कोट- कारखाना कोण चालविण्यास घेत हे महत्त्वाचे नाही, तर कारखाना सुरू होणे महत्त्वाचे आहे. चार तालुक्यांचे वैभव असलेला हा ...

कोट-

कारखाना कोण चालविण्यास घेत हे महत्त्वाचे नाही, तर कारखाना सुरू होणे महत्त्वाचे आहे. चार तालुक्यांचे वैभव असलेला हा कारखाना बंद पडल्यानंतर येथील शेतकरी अडचणीत आले आहेत. जो कुणी चालू करत असेल त्याला सर्वांनी एकदिलाने साथ द्यायला हवी. शेतकऱ्यांबरोबरच अनेक कामगारांचे पैसे अडकलेले आहेत, त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यासाठी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवा आणि कारखाना सुरू करा. - बबन कांगणे, दोनवाडे

कोट-

बाहेरचे कारखाने आताच ऊस न्यायला नकार देत आहेत. निफाड कारखाना बंद आहे, काही कारखाने शेवटच्या टप्प्यात तोडणी करतात. त्यासाठी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात रकमेची मागणी केली जाते. यासाठी आपला कारखाना सुरू होणे गरजेचे आहे. फक्त सुरू होताना तो चांगल्या माणसांच्या हाती जावा, एवढीच अपेक्षा आहे. - उत्तमराव सहाणे, साकूर

कोट-

नासाका बंद झाल्याने उसाचे क्षेत्र घटून भाजीपाल्याचे क्षेत्र वाढले आहे; पण भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांना ऊस परवडतो. उसासाठी ५० टक्के क्षेत्र गेले तरी चालते. त्यातून शेतकऱ्यांच्या हाती एकरकमी दोन पैसे मिळतात. कोण चालवायला घेतो हे महत्त्वाचे नाही तर कारखाना चालू होणे महत्त्वाचे आहे. केवळ विरोधासाठी विरोध न करता जे विरोध करतात त्यांनी सक्षम पर्याय तरी द्यावा कारण चार तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांचे जीवन यावर अवलंबून आहे. - बाळासाहेब कासार, भगूर, दे.कॅम्प

कोट-

इगतपुरी तालुक्यातून आजही इतर कारखान्यांना सुमारे एक लाख मेट्रिक टन ऊस जातो; पण आता या कारखान्यांकडूनच संदेश येऊ लागले आहेत. अजून तोडीला चार ते सहा महिने आहेत; पण आतापासूनच शेतकरी चिंतेत आहेत. यासाठी हक्काचा कारखाना सुरू होणे गरजेचे आहे. कारखाना कुणीतरी चालविलाच पाहिजे, अगदी जिल्हा बँकेनेही कारखाना चालविला तरी सभासदांना चालणार आहे. - उल्हास जाधव, शेणीत

कोट-

माझा दोन एकर ऊस उभा आहे. बावीस महिन्यांचा हा ऊस कोण घेणार, असा प्रश्न मला पडला आहे. कारखाना सुरू होणे ही काळाची गरज आहे. कोण चालवतो याला महत्त्व नाही; पण कारखान्याची चाके फिरावीत, हीच सर्वसामान्य शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आज शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. हक्काचा कारखाना असता तर ही स्थिती उद्भवली नसती - माणिक कासार, शेवगे