शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

कुणीही चालवा पण एकदाची चाके फिरू द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST

कोट- कारखाना कोण चालविण्यास घेत हे महत्त्वाचे नाही, तर कारखाना सुरू होणे महत्त्वाचे आहे. चार तालुक्यांचे वैभव असलेला हा ...

कोट-

कारखाना कोण चालविण्यास घेत हे महत्त्वाचे नाही, तर कारखाना सुरू होणे महत्त्वाचे आहे. चार तालुक्यांचे वैभव असलेला हा कारखाना बंद पडल्यानंतर येथील शेतकरी अडचणीत आले आहेत. जो कुणी चालू करत असेल त्याला सर्वांनी एकदिलाने साथ द्यायला हवी. शेतकऱ्यांबरोबरच अनेक कामगारांचे पैसे अडकलेले आहेत, त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यासाठी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवा आणि कारखाना सुरू करा. - बबन कांगणे, दोनवाडे

कोट-

बाहेरचे कारखाने आताच ऊस न्यायला नकार देत आहेत. निफाड कारखाना बंद आहे, काही कारखाने शेवटच्या टप्प्यात तोडणी करतात. त्यासाठी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात रकमेची मागणी केली जाते. यासाठी आपला कारखाना सुरू होणे गरजेचे आहे. फक्त सुरू होताना तो चांगल्या माणसांच्या हाती जावा, एवढीच अपेक्षा आहे. - उत्तमराव सहाणे, साकूर

कोट-

नासाका बंद झाल्याने उसाचे क्षेत्र घटून भाजीपाल्याचे क्षेत्र वाढले आहे; पण भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांना ऊस परवडतो. उसासाठी ५० टक्के क्षेत्र गेले तरी चालते. त्यातून शेतकऱ्यांच्या हाती एकरकमी दोन पैसे मिळतात. कोण चालवायला घेतो हे महत्त्वाचे नाही तर कारखाना चालू होणे महत्त्वाचे आहे. केवळ विरोधासाठी विरोध न करता जे विरोध करतात त्यांनी सक्षम पर्याय तरी द्यावा कारण चार तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांचे जीवन यावर अवलंबून आहे. - बाळासाहेब कासार, भगूर, दे.कॅम्प

कोट-

इगतपुरी तालुक्यातून आजही इतर कारखान्यांना सुमारे एक लाख मेट्रिक टन ऊस जातो; पण आता या कारखान्यांकडूनच संदेश येऊ लागले आहेत. अजून तोडीला चार ते सहा महिने आहेत; पण आतापासूनच शेतकरी चिंतेत आहेत. यासाठी हक्काचा कारखाना सुरू होणे गरजेचे आहे. कारखाना कुणीतरी चालविलाच पाहिजे, अगदी जिल्हा बँकेनेही कारखाना चालविला तरी सभासदांना चालणार आहे. - उल्हास जाधव, शेणीत

कोट-

माझा दोन एकर ऊस उभा आहे. बावीस महिन्यांचा हा ऊस कोण घेणार, असा प्रश्न मला पडला आहे. कारखाना सुरू होणे ही काळाची गरज आहे. कोण चालवतो याला महत्त्व नाही; पण कारखान्याची चाके फिरावीत, हीच सर्वसामान्य शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आज शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. हक्काचा कारखाना असता तर ही स्थिती उद्भवली नसती - माणिक कासार, शेवगे