शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कुणीही चालवा पण एकदाची चाके फिरू द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST

कोट- कारखाना कोण चालविण्यास घेत हे महत्त्वाचे नाही, तर कारखाना सुरू होणे महत्त्वाचे आहे. चार तालुक्यांचे वैभव असलेला हा ...

कोट-

कारखाना कोण चालविण्यास घेत हे महत्त्वाचे नाही, तर कारखाना सुरू होणे महत्त्वाचे आहे. चार तालुक्यांचे वैभव असलेला हा कारखाना बंद पडल्यानंतर येथील शेतकरी अडचणीत आले आहेत. जो कुणी चालू करत असेल त्याला सर्वांनी एकदिलाने साथ द्यायला हवी. शेतकऱ्यांबरोबरच अनेक कामगारांचे पैसे अडकलेले आहेत, त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यासाठी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवा आणि कारखाना सुरू करा. - बबन कांगणे, दोनवाडे

कोट-

बाहेरचे कारखाने आताच ऊस न्यायला नकार देत आहेत. निफाड कारखाना बंद आहे, काही कारखाने शेवटच्या टप्प्यात तोडणी करतात. त्यासाठी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात रकमेची मागणी केली जाते. यासाठी आपला कारखाना सुरू होणे गरजेचे आहे. फक्त सुरू होताना तो चांगल्या माणसांच्या हाती जावा, एवढीच अपेक्षा आहे. - उत्तमराव सहाणे, साकूर

कोट-

नासाका बंद झाल्याने उसाचे क्षेत्र घटून भाजीपाल्याचे क्षेत्र वाढले आहे; पण भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांना ऊस परवडतो. उसासाठी ५० टक्के क्षेत्र गेले तरी चालते. त्यातून शेतकऱ्यांच्या हाती एकरकमी दोन पैसे मिळतात. कोण चालवायला घेतो हे महत्त्वाचे नाही तर कारखाना चालू होणे महत्त्वाचे आहे. केवळ विरोधासाठी विरोध न करता जे विरोध करतात त्यांनी सक्षम पर्याय तरी द्यावा कारण चार तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांचे जीवन यावर अवलंबून आहे. - बाळासाहेब कासार, भगूर, दे.कॅम्प

कोट-

इगतपुरी तालुक्यातून आजही इतर कारखान्यांना सुमारे एक लाख मेट्रिक टन ऊस जातो; पण आता या कारखान्यांकडूनच संदेश येऊ लागले आहेत. अजून तोडीला चार ते सहा महिने आहेत; पण आतापासूनच शेतकरी चिंतेत आहेत. यासाठी हक्काचा कारखाना सुरू होणे गरजेचे आहे. कारखाना कुणीतरी चालविलाच पाहिजे, अगदी जिल्हा बँकेनेही कारखाना चालविला तरी सभासदांना चालणार आहे. - उल्हास जाधव, शेणीत

कोट-

माझा दोन एकर ऊस उभा आहे. बावीस महिन्यांचा हा ऊस कोण घेणार, असा प्रश्न मला पडला आहे. कारखाना सुरू होणे ही काळाची गरज आहे. कोण चालवतो याला महत्त्व नाही; पण कारखान्याची चाके फिरावीत, हीच सर्वसामान्य शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आज शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. हक्काचा कारखाना असता तर ही स्थिती उद्भवली नसती - माणिक कासार, शेवगे