शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

करंजवण धरणातील आवर्तन आज थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:14 IST

झिरवाळ यांनी म्हटले आहे, सध्या धरणात २० टक्के पाणी शिल्लक असले तरी धरणात मोठ्या प्रमाणात गाळ असल्यामुळे प्रत्यक्ष धरणात ...

झिरवाळ यांनी म्हटले आहे, सध्या धरणात २० टक्के पाणी शिल्लक असले तरी धरणात मोठ्या प्रमाणात गाळ असल्यामुळे प्रत्यक्ष धरणात पाणी किती टक्के आहे हे सांगणे कठीण झाले आहे. त्यामुळे निफाड, येवला, मनमाड तालुक्यासाठी करंजवण धरणातील पाणी आरक्षित केलेले असले तरी ज्या धरणासाठी स्थानिक जनतेच्या जमिनी दिल्या आहेत त्यांचा त्याग लक्षात घेता त्यांनाही पाणी मिळाले पाहिजे यासाठी शासन स्तरावर बोलणी चालू आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व धरणातील व नदीवरील पाणी परवानग्या बंद होत्या. या संदर्भात वारंवार बैठका घेऊन सर्व ठिकाणची पाणी परवानगी चालू करण्यात आली आहे. लवकरच तलाठ्यामार्फत सातबारा उतारे घेऊन तसेच गावा-गावांत बैठका घेऊन धरण व नदीवर सोसायटी स्थापन करणार आहे. त्यामुळे तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

चालू वर्षी मांजरपाडा प्रकल्पातून ३५ टक्के पाणी पुणेगावसह ओझरखेड धरणात आले आहे. त्यामुळे या धरणांना संजीवनी मिळाली आहे. सध्या मांजरपाडा प्रकल्पाचे काम चालू असून हे काम या वर्षी पूर्ण झाले नाही तरी चालू वर्षी मांजरपाडा प्रकल्पातून १०० टक्के पाणी हे तालुक्यात येणार असल्यामुळे दिंडोरी तालुक्यासह चादवंड, येवला, मनमाड, निफाड तालुक्याला फायदा होणार असल्याचेही झिरवाळ यांनी सांगितले.

इन्फो

टप्प्याटप्प्याने पाणी सोडणार

तालुक्यातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने करंजवण धरणातून सोडलेले आवर्तन बंद करण्यात येणार असून पुढील महिन्यापासून टप्प्याटप्प्याने सोडण्यात येणार असल्याचेही झिरवाळ यांनी सांगितले. दरम्यान, करंजवणसह परिसरातील गावकऱ्यांनी या लांबलेल्या आवर्तनाला कडाडून विरोध दर्शविला होता.