शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

करंजवण धरणातील आवर्तन आज थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:14 IST

झिरवाळ यांनी म्हटले आहे, सध्या धरणात २० टक्के पाणी शिल्लक असले तरी धरणात मोठ्या प्रमाणात गाळ असल्यामुळे प्रत्यक्ष धरणात ...

झिरवाळ यांनी म्हटले आहे, सध्या धरणात २० टक्के पाणी शिल्लक असले तरी धरणात मोठ्या प्रमाणात गाळ असल्यामुळे प्रत्यक्ष धरणात पाणी किती टक्के आहे हे सांगणे कठीण झाले आहे. त्यामुळे निफाड, येवला, मनमाड तालुक्यासाठी करंजवण धरणातील पाणी आरक्षित केलेले असले तरी ज्या धरणासाठी स्थानिक जनतेच्या जमिनी दिल्या आहेत त्यांचा त्याग लक्षात घेता त्यांनाही पाणी मिळाले पाहिजे यासाठी शासन स्तरावर बोलणी चालू आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व धरणातील व नदीवरील पाणी परवानग्या बंद होत्या. या संदर्भात वारंवार बैठका घेऊन सर्व ठिकाणची पाणी परवानगी चालू करण्यात आली आहे. लवकरच तलाठ्यामार्फत सातबारा उतारे घेऊन तसेच गावा-गावांत बैठका घेऊन धरण व नदीवर सोसायटी स्थापन करणार आहे. त्यामुळे तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

चालू वर्षी मांजरपाडा प्रकल्पातून ३५ टक्के पाणी पुणेगावसह ओझरखेड धरणात आले आहे. त्यामुळे या धरणांना संजीवनी मिळाली आहे. सध्या मांजरपाडा प्रकल्पाचे काम चालू असून हे काम या वर्षी पूर्ण झाले नाही तरी चालू वर्षी मांजरपाडा प्रकल्पातून १०० टक्के पाणी हे तालुक्यात येणार असल्यामुळे दिंडोरी तालुक्यासह चादवंड, येवला, मनमाड, निफाड तालुक्याला फायदा होणार असल्याचेही झिरवाळ यांनी सांगितले.

इन्फो

टप्प्याटप्प्याने पाणी सोडणार

तालुक्यातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने करंजवण धरणातून सोडलेले आवर्तन बंद करण्यात येणार असून पुढील महिन्यापासून टप्प्याटप्प्याने सोडण्यात येणार असल्याचेही झिरवाळ यांनी सांगितले. दरम्यान, करंजवणसह परिसरातील गावकऱ्यांनी या लांबलेल्या आवर्तनाला कडाडून विरोध दर्शविला होता.