शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
3
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
4
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
5
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
6
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
7
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
8
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
9
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
10
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
11
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
12
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
13
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
14
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
15
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
16
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
17
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
18
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
19
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
20
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक

पावसाने बळीराजा सुखावला

By admin | Updated: July 14, 2016 00:48 IST

येवला : पालखेडच्या आवर्तनामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

 येवला : शनिवारपासून झालेल्या पेरणीयोग्य पावसाने बळीराजा सुखावला असला तरी येवला तालुक्यातील दुष्काळ अजून संपलेला नाही. दमदार पावसाची प्रतीक्षा अजूनही आहे. अशातच येवला शहराची पाण्याची गरज भागविण्यासाठी पालखेडचे पाणी आवर्तन येवल्यात मंगळवारी मध्यरात्री पोहोचले. या पाण्यामुळे केवळ शहर व तालुक्यातील काही गावांची पिण्याच्या पाण्याची गरज भागणार आहे. पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याने दिलासा दिला असे म्हणण्याची वेळ आली आहे. संपूर्ण जून कोरडाच गेला. जुलैच दुसरा आठवडा आणि पुनर्वसू नक्षत्राने पावसाला सुरुवात झाली. आणि किमान पेरण्या ८० टक्क्यापर्यंत आटोपल्या. आगामी चार दिवसात १०० टक्के पेरण्या होतील असा अंदाज आहे. ७० मिमी पावसाने केवळ पेरण्यायोग्य परिस्थिती झाली असली तरी विहिरी कोरड्याठाक आहेत. पालखेडच्या पाणी आवर्तनाने येवला तालुक्यातील सर्वच बंधारे भरून द्यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. हे बंधारे पालखेडच्या पूरपाण्याने भरून दिले तर शेतशिवारात पाणी फिरेल आणि विहिरीलाही पाणी उतरेल. अन्यथा पिण्याच्या पाण्याची समस्या कायम राहील. पालखेड डाव्या कालव्यातून ७२० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. शहर साठवण तलाव, ३८ गाव पाणी साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले जातील. पाणीटंचाईची झळ व चांगलेच चटके शोषिक येवलेकरांना बसले आहेत. सद्या येवला शहर व ३८ गाव पाणी योजनेला पाणीपुरवठा करणारे तलाव भरून देणेसाठी पालखेड डावा कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहेत. हे तलाव भरून झाल्यानंतर येवले तालुक्यातील पालखेड डावा कालवा लाभक्षेत्रातील चारी क्र. ५२ पर्यंतचे सर्व बंधारे भरून द्यावेत कारण येवले तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असून, सर्व बंधारे कोरडे आहेत. आजही तालुक्यात ९ टँकरद्वारे २२ गावे व सहा वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. तेव्हा पाण्याची टंचाई लक्षात घेता लाभ क्षेत्रातील सर्व बंधारे भरून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (वार्ताहर)