शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

पावसाने बळीराजा सुखावला

By admin | Updated: July 14, 2016 00:48 IST

येवला : पालखेडच्या आवर्तनामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

 येवला : शनिवारपासून झालेल्या पेरणीयोग्य पावसाने बळीराजा सुखावला असला तरी येवला तालुक्यातील दुष्काळ अजून संपलेला नाही. दमदार पावसाची प्रतीक्षा अजूनही आहे. अशातच येवला शहराची पाण्याची गरज भागविण्यासाठी पालखेडचे पाणी आवर्तन येवल्यात मंगळवारी मध्यरात्री पोहोचले. या पाण्यामुळे केवळ शहर व तालुक्यातील काही गावांची पिण्याच्या पाण्याची गरज भागणार आहे. पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याने दिलासा दिला असे म्हणण्याची वेळ आली आहे. संपूर्ण जून कोरडाच गेला. जुलैच दुसरा आठवडा आणि पुनर्वसू नक्षत्राने पावसाला सुरुवात झाली. आणि किमान पेरण्या ८० टक्क्यापर्यंत आटोपल्या. आगामी चार दिवसात १०० टक्के पेरण्या होतील असा अंदाज आहे. ७० मिमी पावसाने केवळ पेरण्यायोग्य परिस्थिती झाली असली तरी विहिरी कोरड्याठाक आहेत. पालखेडच्या पाणी आवर्तनाने येवला तालुक्यातील सर्वच बंधारे भरून द्यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. हे बंधारे पालखेडच्या पूरपाण्याने भरून दिले तर शेतशिवारात पाणी फिरेल आणि विहिरीलाही पाणी उतरेल. अन्यथा पिण्याच्या पाण्याची समस्या कायम राहील. पालखेड डाव्या कालव्यातून ७२० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. शहर साठवण तलाव, ३८ गाव पाणी साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले जातील. पाणीटंचाईची झळ व चांगलेच चटके शोषिक येवलेकरांना बसले आहेत. सद्या येवला शहर व ३८ गाव पाणी योजनेला पाणीपुरवठा करणारे तलाव भरून देणेसाठी पालखेड डावा कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहेत. हे तलाव भरून झाल्यानंतर येवले तालुक्यातील पालखेड डावा कालवा लाभक्षेत्रातील चारी क्र. ५२ पर्यंतचे सर्व बंधारे भरून द्यावेत कारण येवले तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असून, सर्व बंधारे कोरडे आहेत. आजही तालुक्यात ९ टँकरद्वारे २२ गावे व सहा वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. तेव्हा पाण्याची टंचाई लक्षात घेता लाभ क्षेत्रातील सर्व बंधारे भरून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (वार्ताहर)